मुंबई : संतोष परब यांच्यावरील कथीत जीवघेणा हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनावर मुंबई हायकोर्टाकडून आजही निकाला येऊ शकला नाही. या प्रकरणी आता उद्या सुनावणी होणार आहे. दरम्यान, नितेश राणे यांना उद्यापर्यंत अटकेपासून दिलासा कायम असणार आहे.
प्रताप सरनाईकांच्या इमारतीचा दंड माफ करण्यासाठी मंत्रिमंडळात प्रस्ताव; भाजप नेते आवाज उठवणार?
या अटकपूर्व जामिनावर जोपर्यंत मुंबई हायकोर्ट आपला निकाल देत नाही तोपर्यंत नितेश राणे यांच्यासह अन्य आरोपींविरोधात कुठलीही कठोर कारवाई होणार नाही, अशी ग्वाही राज्य शासनानं हायकोर्टात दिली आहे. याची नोंद घेत हायकोर्टानं उद्या दुपारी सुनावणी घेण्याच निश्चित केलं आहे.
“फडणवीस गोव्यात गेल्यानंतर भाजप पक्ष फुटला”; संजय राऊतांची फडणवीसांवर टीका
दरम्यान, आजच्या सुनावणीत नितेश राणे यांच्या वकिलांकडून अटकपूर्व जामीन अर्जावर युक्तीवाद पूर्ण करण्यात आला. यावेळी त्यांनी हे प्रकरण निव्वळ राजकीय वैमन्यस्यातून उकरुन काढत नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप केला. विधानभवनातील म्याव म्याव प्रकरणानंतर जुन्या प्रकरणावरुन त्यांच्यावर हा गुन्हा दाखल केल्याचं यावेळी राणेंच्या वकिलांनी कोर्टाला सांगितलं.
Read also:
- १२ आमदारांच्या निलंबनावरून सुप्रीम कोर्टाचे सरकारवर ताशेरे; ५९ दिवसांपेक्षा अधिक काळ निलंबन चुकीचंच
- मुंबईत कोरोनाचा प्रभाव कमी होतोय; महापौर पेडणेकर म्हणतात… आता एवढी एकच गोष्ट करा…
- पुणे महापालिका निवडणूक लांबणीवर पडण्याची जोरदार चर्चा…
- दिलासादायक बातमी: मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या घटली, गेल्या दोन दिवसात १० टक्यांनी घट
- राष्ट्रवादीची वाटचाल देशपातळीकडे; उत्तरप्रदेश, मणिपूरसहित गोव्यातही निवडणूक लढवणार