बीड : बीडमधील प्रकरणाबाबत पोलिसांनी आतापर्यंत ३४ जणांना अटक केली आहे. शिवाजी नगर पोलिस हद्दीतून २४ जणांना तर शहारातून दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. बीडमध्ये काल सांयकाळी तोडफोडीसह जाळपोळ करण्यात आली होती. यावर आता पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. यावरून मनोज जरांगे पाटलांनी पोलिसांना कडक इशारा दिला आहे.
हेही वाचा…बीड जाळपोळीच्या घटनेबाबत मोठी कारवाई होणार, फडणवीसांनी पोलिसांना दिले आदेश
बीडमधील प्रकरण लगेच बंद करा, हिंसा बंद करा असे आवाहन मनोज जरांगे पाटलांनी केलं आहे. बीडमध्ये लहान मुलांवर गुन्हे दाखल केले तर बीडला येईल आणि मराठे काय असतात ते कळेल. असा इशाराही त्यांनी पोलिसांना दिला आहे. उद्यापासून पाणी पण बंद करेल. आता पुढची जबाबदारी सरकारची असेल. अर्धवट निर्णय आम्हाला मान्य नाही असंही ते म्हणाले.
हेही वाचा…“तिथे मणिपूर, जळतंय, इथे महाराष्ट्र पेटतंय., मोदी फक्त भाषण करून जातात”
दरम्यान,राज्य सरकारने घेतलेला एकही निर्णय मान्य नसल्याची चपराक मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी लगावली. त्यामुळे मराठा आरक्षणाची कोंडी फुटण्याची सुतराम शक्यता दिसत नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी उद्या सरकारने विशेष अधिवेशन बोलवानवे अशी मागणीही त्यांनी केलीय.
READ ALSO :
हेही वाचा…“शिंदे समितीचा अहवाल प्राथमिक असून अजून काम करणं बाकी”, मराठा आरक्षणाला अजून वेळ लागणार ?
हेही वाचा…“घर जळत होतं, तेव्हा मुल देवा घरात हात जोडून होती,” क्षीरसागर कुटुंबीयांनी सांगितला धक्कादायक अनुभव
हेही वाचा…“जाळपोळ झाली तेव्हा घरात होतो, काही लोकांनी ठरवून जाळपोळ केली”, योगेश क्षीरसागरांनी दिली प्रतिक्रिया
हेही वाचा…प्रवेश बंदी असताना आलेल्या आमदार विश्वजीत कदम यांना पाठवलं माघारी
हेही वाचा…“मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षण घालवलं,” भाजपचा जोरदार पलटवार