कोल्हापूर : राजकारणात साम, दाम, दंड भेद या युक्तीचा वापर करून अनेक गोष्टी साध्य केल्या जातात. सत्ता मिळवण्यासाठी कित्येकदा मोठ्या प्रमाणावर पैशांची उलाढाल केली जाते. घोडेबाजार केला जातो. हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. कित्येकदा राजकीय नेते याबाबत उघड भूमिका घेत असतात आणि आपले अनुभव सांगण्याचा प्रयत्न करत असतात. असंच काहीसं घडलं आहे कोल्हापूरमध्ये. जनसुराज्य पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे यांनी कोल्हापूरच्या महापौर निवडणुकीचा संदर्भ देत किती घोडेबाजार त्यावेळी झाला होता याची थेट कबुली दिली आहे.
कोकणात मनसेची हवा, खेडमध्ये पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकही मनसेत
काही वर्षांपूर्वी कोल्हापूर सतेज उर्फ बंटी पाटील आणि महादेवराव उर्फ आप्पा महाडिक यांनी पालिका राजकारणात आमच्या विरोधात युती केली होती. त्यावेळी माझी आणि हसन मुश्रिफांची युती होती. त्यावेळी कोल्हापुरात महापौर करण्यासाठी एका-एका नगरसेवकाला तब्ब्ल ३५-३५ लाख रुपये दिले होते. माझ्या पक्षाचा महापौर झाला. मात्र, लोकांचा माझ्याबद्दल पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. भावनेच्या भरात माझ्याकडून झालेली ही सर्वात मोठी चुक होती, अशी कबुली कोरे यांनी दिली. सर्वसामान्य लोकांच्या मनात राजकारणाबद्दल तिरस्कार निर्माण होईल, असे राजकारण बंद झाले पाहिजे, असेही कोरे यांनी म्हटले.
“कसं काय शेलार बरं हाय का? काल काय ऐकलं ते खरं हाय का?”; शिवसेनेचे आक्षेपार्ह पोस्टर
मागच्या काही आठवड्यांमध्येच कोल्हापूर विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध करण्यात आली. यावेळी मी पुढाकार घेतला होता. मर्यादित मतदार असलेल्या निवडणुकांमध्ये समन्वयाची भूमिका घ्यायला हवी अशी माझी भूमिका आहे आणि ती यावेळी सर्वांनी मान्य केली. समन्वयाचं, विचाराच राजकारण आपणाला सुरु करता येईल का हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून कोल्हापूर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मी प्रयत्न केला असं देखील विनय कोरे यांनी स्पष्ट केलं आहे. वडगाव बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा रविवारी करण्यात आली. यावेळी पत्रकारांशी बोलताना आमदार विनय कोरे यांनी ही कबुली दिली.
Read Also :
- पवार साहेबांचं नेतृत्व फक्त आणि फक्त साडेतीन जिल्ह्यात; निलेश राणेंनी उडवली खिल्ली
- राज्यात ज्याला आजपर्यंत दोन अंकी पाठबळ मिळालं नाही त्याला तुम्ही पंतप्रधान करणार – सताभाऊ खोत
- …आणि पवार साहेबांबद्दल बोलताना अजितदादांचा कंठ दाटून आला..!
- “गोपीनाथ मुंडेंनी केंद्रावर दबाव आणून आरक्षण मिळवून दिलं असतं”
- “राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यन्वित होणार आहे की नाही?”