मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे मुख्य प्रणेते शरदचंद्रजी पवार यांचा 12 डिसेंबर रोजी ८१ वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी कार्यक्रमांचे नियोजन केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे नेहरू सेंटरमध्ये पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला दिग्ग्ज मंत्री, आमदार, खासदार इत्यादी मंडळी उपस्थित होत्या. या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे शिरूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जोरदार भाषण केले.
“शरद पवार हे पॉवर हाऊस, त्यांच्या निर्णयामुळे परिवर्तन होतं”
अमोल कोल्हे भाषणात म्हणाले की स्वर्गीय अटलजींना भुज भूकंपाच्या वेळी शरद पवार यांची वाहवा केली होती. गेल्या ४० वर्षांपासून पवार साहेबांचा दिल्लीत दबदबा आहे. महाराष्ट्राचे नाव दिल्लीत जोरदार मांडण्याचे काम पवार साहेबांनी केले आहे. जर २६ खासदार असणाऱ्या गुजरातचे नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकतात तर ४८ खासदार असणाऱ्या महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांचा मावळा पंतप्रधानपदी का बसू शकत नाही ? असा सवाल देखील कोल्हेंनी केला होता. या वक्तव्यानंतर विरोधी पक्षातील काही नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर सडकून टीका केली आहे. माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वप्न बघायला काय हरकत नाही असं म्हणत कोल्हेंच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे.
कोकणात मनसेची हवा, खेडमध्ये पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकही मनसेत
भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून कोल्हेंवर हल्ला चढवला आहे. निलेश राणे म्हणाले की, शरद पवार हे राजकारणात इतर पक्षांची मदत घेतल्याशिवाय स्वतःच्या पक्षाच्या जीवावर काही करू शकत नाही. तसेच शरद पवारांचं नेतृत्व महाराष्ट्रात फक्त आणि फक्त साडेतीन जिल्ह्यात आहे, त्यात पण पूर्ण १००% टक्के नाही. दिल्लीमध्ये शरद पवारांनी महाराष्ट्राचे सोडून १०० कार्यकर्ते दाखवावे, असं म्हणतं कोल्हेंच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे.
Read Also :
- राज्यात ज्याला आजपर्यंत दोन अंकी पाठबळ मिळालं नाही त्याला तुम्ही पंतप्रधान करणार – सताभाऊ खोत
- …आणि पवार साहेबांबद्दल बोलताना अजितदादांचा कंठ दाटून आला..!
- “गोपीनाथ मुंडेंनी केंद्रावर दबाव आणून आरक्षण मिळवून दिलं असतं”
- “राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यन्वित होणार आहे की नाही?”
- “कसं काय शेलार बरं हाय का? काल काय ऐकलं ते खरं हाय का?”; शिवसेनेचे आक्षेपार्ह पोस्टर