मुंबई : १२ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे मुख्य प्रणेते शरदचंद्रजी पवार यांचा ८१ वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी कार्यक्रमांचे नियोजन केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे नेहरू सेंटरमध्ये कार्यक्रमाचेआयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विविध नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी शरद पवारांबाबत कौतुकोद्गार काढले.
शिवसेनेच्या बॅनरमुळे जालन्यात वातावरण तापले; दानवे- खोतकरांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपाचा कलगीतूरा
शरद पवार यांचे करताना अमोल कोल्हे यांनी भारतीय जनता पक्षाला देखील टोमणे मारले. शरद पवार हे छत्रपती शाहू महाराजांचे खरे वारसदार आहेत. महिलांना लष्करात भरती, राजकारणात आरक्षण देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्याची अमंलबजावणी साहेबांनी केली. याच महिलांना आज प्रगतीची शिखरे गाठली आहेत. गेल्या ४० वर्षांपासून पवार साहेबांचा दिल्लीत दबदबा आहे. महाराष्ट्राचे नाव दिल्लीत जोरदार मांडण्याचे काम पवार साहेबांनी केले आहे. जर २६ खासदार असणाऱ्या गुजरातचे नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकतात तर ४८ खासदार असणाऱ्या महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांचा मावळा पंतप्रधानपदी का बसू शकत नाही ? असा सवाल देखील कोल्हेंनी केला होता.
“शरद पवार हे पॉवर हाऊस, त्यांच्या निर्णयामुळे परिवर्तन होतं”
यावर आता माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खोत यांनी अमोल कोल्हेंना टोमणा मारत म्हटलं आहे साहेब, स्वप्न बघायला काय हरकत नाही. राज्याच्या आता पर्यंतच्या प्रवासात दोन अंकी आकड्याचा पाठबळा सुद्धा कधी मिळाला नाही. तरी, तुम्ही पंतप्रधान पदाची स्वप्न बघताय त्या स्वप्ननान माझ्या मनःपुर्वक शुभेच्छा.
Read Also :
- …आणि पवार साहेबांबद्दल बोलताना अजितदादांचा कंठ दाटून आला..!
- “गोपीनाथ मुंडेंनी केंद्रावर दबाव आणून आरक्षण मिळवून दिलं असतं”
- “राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यन्वित होणार आहे की नाही?”
- “कसं काय शेलार बरं हाय का? काल काय ऐकलं ते खरं हाय का?”; शिवसेनेचे आक्षेपार्ह पोस्टर
- कोकणात मनसेची हवा, खेडमध्ये पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकही मनसेत