मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पॉवर हाऊस आहेत. त्यांचा नेम अचूक असतो. त्यांच्या निर्णयामुळे परिवर्तन होतं, हा इतिहास आहे. महाराष्ट्रात, देशात माणसं कशी जोडायची, हे पवारांनी शिकवलं, त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा, अशी स्तुतीसुमनं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उधळली.
आमच्या घरी लवकरच सरकारी पाहुणे येणार आहेत; मलिकांच्या ट्विटने पुन्हा खळबळ
शरद पवार यांचा आज 81वा वाढदिवस आहे. यानिमित्त नेहरू सेंटर मध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात जयंत पाटील बोलत होते. या कार्यक्रमात विविध नेते उपस्थित होते. ते म्हणाले, की विचारांची लढाई उभी करायची असेल तर गावागावात जाऊन विद्यार्थ्यांचं, तरुणांचं मार्गदर्शन घ्यावं. 184 विधानसभा मतदारसंघात पोहोचलो. विद्यार्थी राष्ट्रवादीला आम्ही एवढेच सांगतो, की 2024चा विचार करू नका. त्यापुढचा विचार करा. लोकापर्यंत पोहोचण्यासाठी तळागाळातल्यांशी संवाद साधावा. काँग्रेस पक्षानं सेवादल नावाची संघटना स्थापन केली. महात्मा गांधीं चा विचार त्यामागे होता.
पिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेसची ताकद अजिबातच नाही; अजित पवारांनी डिवचलं
मराठवाडा विद्यापीठ नामकरण, महिलांचं आरक्षण तसेच महाविकास आघाडी निर्माण करण्याचा निर्णय आदी महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतले, यामुळे परिवर्तन झालं. देशातल्या कोणत्याही नेत्याला त्यांचं मार्गदर्शन घ्यावं लागतं, असं ते म्हणाले.
Read Also :
- “मुंडेंसारखा नेता असता तर युती कायम राहिली असती”, राऊतांचे मोठे विधान
- “विरोधी पक्ष महाराष्ट्रात झोपलेला आहे. काम काय त्यांना?”
- शिवसेनेचा कारनामा: सरकारी कामात अडथळा, तीन माजी नगरसेवकांना दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा
- एमआयएमच्या रॅलीला मुंबईमध्ये प्रवेश मिळणार नाही – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
- भाजप आमदाराच्या वाढदिवसाच्या बॅनरवर खडसेंचा फोटो; जळगावच्या राजकारणात उडाली खळबळ