छत्रपती संभाजीनगर : बैठकीआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेली औरंगाबाद येथील राज्य सरकारच्या कॅबिनेत बैठकच्या वेळी तब्बल १५ मोर्चे निघणार असल्याची माहिती समोर आली आहे. वारेमाफ खर्च, अन् विविध कारणांमुळे राज्य सरकारची कॅबिनेट बैठक होण्याच्या आधीच त्यावर राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. यातच बैठक होण्याच्या आधीच राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा…कॅबिनेट बैठकीवर ‘हे’ 15 मोर्चे धडकणार, शहराला पोलीस छावणीचे स्वरूप
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच्या नामकरण फलकांचे अनावरण करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर महसुली विभागासह जिल्हा, उपविभाग, तालुका, गावाचे आणि धाराशिव जिल्हा, उपविभाग, तालुका, गावाचे नामकरण करण्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात राज्य सरकारने परिपत्रकही काढले आहे.
हेही वाचा…ठाकरेंच्या शिलेदारांवर चौकशा अन् गुन्हे दाखल होण्याचे शुल्ककाष्ठ, आणखी एक ‘हा’ शिलेदार अडचणीत
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते छत्रपतीसंभाजीनगर शहरातील विविध प्रकल्प, इमारतींचे दूरदृश्य प्रणालीद्वारे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. सातारा व देवळाई परिसरातील मलनि:स्सारण योजनेचे भूमिपूजन तर हर्सूल येथील घनकचरा प्रक्रिया केंद्राच्या लोकार्पणाचा यात समावेश आहे. केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री संदिपान भुमरे, कृषी मंत्री धनंजय मुंडे, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार आदी मान्यवर उपस्थित होते.
READ ALSO :
हेही वाचा…उद्धव ठाकरे हेच सर्वोत्तम मुख्यमंत्री ! सर्व्हेत ठाकरेंना जनतेची पसंती, शिंदेंना फक्त ३.९० तर फडणवीसांना ६.७६ टक्के पसंती
हेही वाचा…ठाकरे गटाकडून ५०० तर शिंदे गटाकडून ६००० पानी उत्तर, कोर्टातील ‘ती’ सुनावणी फार महत्वाची
हेही वाचा…राज्यातील ‘या’ माजी मंत्र्यांच्या मुलाला शरद पवारांचं बळ, पुण्यात राष्ट्रवादीची ताकद वाढली
हेही वाचा…“कॅबिनेटची बैठक, अति उत्साहात सरकार ४० हजार कोटी रुपयांचा निधी देणार”
हेही वाचा…कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी एकाच ठिकाणी, अजित पवार अन् फडणवीस विरोधात आंदोलन करणार