नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेवल्या आहेत. परंतु त्याआधी इंडिया आघाडीत मोठी फुट पडली आहे. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममती बॅनर्जी स्वत:च्या बळावर लोकसभा निवडणुक लढणार असून कुणीशीही युती करणार नसल्याची घोषणा ममता बॅनर्जी यांनी केली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आधी इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा…मोठी बातमी…! “कॉंग्रेस करणार पुणे लोकसभा जिंकण्यासाठी सक्षम असलेल्या उमेदवाराची घोषणा”
इंडिया आघाडीच्या याआधी तीन बैठका झाल्या आहेत. परंतु या तिन्ही बैठकांमध्ये ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीच्याबाबत वेगळी भूमिका घेतांना दिसत होत्या. यातच पश्चिम बंगालमध्ये कॉंग्रेसने दोन जागा मागितल्या होत्या. परंतु ममता बॅनर्जी त्या जागा सोडण्यास तयार नव्हत्या. त्यामुळे आता पश्चिम बंगालमध्ये आगामी निवडणुकीत कुणाशीही युती करणार नसून लोकसभेच्या सर्व ४२ जागा स्वबळावर लढणार असल्याची घोषणा ममता बॅनर्जी यांनी केली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आधी इंडिया आघाडीला मोठा सुरूंग लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…“पुरोगामी महाराष्ट्रात जाती-धर्मावरून फूट पाडण्याचे डावपेच…”जितेंद्र आव्हाडांचं सुचक विधान
दरम्यान, ममता बनर्जी यांना इंडिया आघाडीकडून जागावाटपांबाबत वारंवार विनंत्या करण्यात आल्या होत्या. मात्र दोन किंवा तीन जागा सोडवण्यावर त्या राजी झाल्या होत्या. यामध्ये कायमच बोलणी फिसकटत होती. यामध्ये कुठलाही सुसंवाद होत नव्हता. यातच आता लोकसभेच्या सर्व जागा आम्ही लढवणार आहोत. यातच भारत जोडो यात्रेचं निमंत्रण देखील आम्हाला देण्यात आलं नाही. त्यामुळे कॉंग्रेसने आमचा कुठलाही प्रस्ताव मान्य केला नाही. असेही ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…नदीपात्रात बोट उलटली, ६ महिला बुडाल्या, नदीकाठवरच नातेवाईकांचा आक्रोश
हेही वाचा…“ईडीच्या भीतीने भाजपच्या बिळात लपलेल्या उंदरांना लवकरच बाहेर काढू”, ठाकरे गटाने दिला इशारा
हेही वाचा…“रोहित पवारांवर सुडाची कारवाई, शेवटपर्यंत लढत राहू,” सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल
हेही वाचा…रामलल्लाच्या मिरवणूकीवर दगडफेक, मग थेट बुलडोझर कारवाई, मीरा रोडवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
हेही वाचा…मुंबईत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक, रोहित पवारांवर ईडीची कारवाई का ? प्रकरण काय ?