नाशिक : भारत सरकारच्या माहितीनुसार केंद्रीय तपास यंत्रणांच्या जवळपास ९५ टक्के कारवाया या विरोधी पक्षातील नेत्यांवर होत आहे. तशाच प्रकराची रोहित पवार यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची टिका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. बारामती अॅग्रो कंपनी कारखाना घोटाळा प्रकरणी ईडीकडून आज रोहित पवारांची चौकशी सुरू आहे. त्यावरून विरोधी पक्षातील नेत्यांकडून जोरदार टिकास्त्र सोडलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी सरकारला मोठा इशारा दिला आहे.
हेही वाचा…ठाकरे गटाचं राज्यव्यापी अधिवेशन, ठाकरे गटाने मांडले हे चार ठराव ?
रोहित पवार यांनाही ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. केंद्रीय तपास यंत्रणा या स्वतंत्र तपास यंत्रणा राहिलेल्या नाहीत. त्या भाजपच्या शाखा झाल्या आहेत. लोकशाहीच्या रक्षणासाठी हुकूमशाही विरोधात आवाज उठवतील. जे भाजपच्या वॉशिंगमशीनमध्ये जायला तयार नाही अशा प्रमुख लोकांना, नातेवाईकांना, सहकाऱ्यांना भाजप ईडीच्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. रोहित पवार हे एकटे नसून संपुर्ण महाविकास आघाडी त्यांच्या पाठीशी आहे. अशीही प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली आहे.
हेही वाचा…आगामी महिन्यात लोकसभा निवडणुकांचा धुराळा, निवडणुक आयोगाने दिली मोठी माहिती
दरम्यान, नाशिक येथे ठाकरे गटाचं अधिवेशन पार पडलं. यावेळी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी देण्यात आली. यावर बोलतांना संजय राऊत म्हणाले की, ही मांजरे, लांडगे ईडीला घाबरून पळून गेले आहेत. ईडीच्या भीतीने भाजपच्या बिळात लपलेल्या उंदरांना अशा प्रकारच्या गर्जना करण्याचा अधिकार नाही. उंदिर गर्जना करत नाहीत. या उंदरांनी बिळातच राहावं योग्यवेळी आम्ही त्यांना बिळातून बाहेर काढू असा इशाराही त्यांनी दिलाय.
READ ALSO :
हेही वाचा…“रोहित पवारांवर सुडाची कारवाई, शेवटपर्यंत लढत राहू,” सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल
हेही वाचा…रामलल्लाच्या मिरवणूकीवर दगडफेक, मग थेट बुलडोझर कारवाई, मीरा रोडवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
हेही वाचा…मुंबईत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक, रोहित पवारांवर ईडीची कारवाई का ? प्रकरण काय ?
हेही वाचा…मोठी बातमी…! “कॉंग्रेस करणार पुणे लोकसभा जिंकण्यासाठी सक्षम असलेल्या उमेदवाराची घोषणा”
हेही वाचा…“पुरोगामी महाराष्ट्रात जाती-धर्मावरून फूट पाडण्याचे डावपेच…”जितेंद्र आव्हाडांचं सुचक विधान