मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना, राज्यातल्या सध्याच्या लॉकडाऊनमध्ये वाढ केली जाणार का? या प्रश्नाचे उत्तर देताना, “याबद्दल उद्या (बुधवारी) मंत्री मंडळाची बैठक होईल, त्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्री याबाबतचा अंतिम निर्णय जाहीर करतील”, असे सांगितले होते.
दरम्यान, आज दुपारी साडे तीन वाजता राज्याच्या मंत्रिमंडळाची ही बैठक सुरु झाली असून, राज्यातल्या एकंदरीत महामारीच्या परिस्थितीचा आढावा यावेळी मुख्यमंत्री घेतील. राज्य सरकारने महामारीची धोकायदाक साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत १५ मे पर्यत लॉकडाऊन आणि कडक निर्बंध लागू केले आहेत. यादरम्यान, राज्यातल्या सक्रिय रुग्णांची संख्या कमी येत असली, तरी रुग्णांचा आकडा हा ५० हजारांच्या आसपास आहे.
तसेच, देशभरातल्या अनेक राज्यांमध्ये परिस्थिती अजूनही गंभीर असून, लॉकडाऊनमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. दुसरीकडे देशात, तसेच राज्यात अजूनही लसींचा आणि ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा असून, राज्यात अनेक ठिकाणी अजूनही गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत लॉकडाऊनमध्ये वाढ होणार का? याबद्दल लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.
Read Also :
- मोदी सरकार संविधान संपवण्याचं काम करतंय – नाना पटोले
- पत्रकार, कॅमेरामन यांना तात्काळ फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करा – देवेंद्र फडणवीस
- “केंद्रीय अर्थमंत्रालयाचे वित्त नियोजन एका वेगळ्याच दर्जाचे…”
- भाजपच्या नेत्यांचा गोव्याला जाण्याचा प्रवासाचा खर्च रुपाली चाकणकर देणार
- आम्ही देखील पाहून घेऊ ‘सामना’चा “सामना”, पुढे कसा करायचा!