रायगड : राज्यातील जिल्हापरिषदेच्या १५ हजारांपेक्षा जास्त महिला सध्या दुर्गम आणि अतिदुर्गम भागात जाऊन काम करत आहेत. भाजप सरकार असताना महिलांना अतिदुर्गम भागात नियुक्त्या देऊच नये असे आदेश होते. मात्र महाविकास आघाडी सरकार आलं आणि त्यांनी नियम रद्द केला. आता या महिलांनी आम्ही दुर्गम भागात नोकरी कशी करावी?, असा सवाल उपस्थित झाला आहे. अशाची परिस्थिती रायगड जिल्हयातील गौळावाडी येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शिक्षिका २ नद्या आणि १ जंगल पार करून येतात. एकदा पेण सोडलं की ना फोनला नेटवर्क ना व्यवस्थित दळणवळणाची साधनं, अशी जीवघेणा प्रवास या शिक्षिकांच्या नशिबी आल्याचे चित्र आहे.
हे पण वाचा, “उद्धव, मी तुझी शिक्षिका, आमच्या वृद्धाश्रमाचं नुकसान झालंय, बाळा भेट मला”
गौळावाडी हे गाव रायगडच्या पेण तालुक्यात आहे. पेणपासून या गावचे अंतर ३९ किमी आहे. परंतू पेडपासून गौळावाडीला जाण्यासाठी थेट बससेवा नाही. ३५ किलोमिटर गाडीचा प्रवास आणि पुढे ४ किलोमिटर जंगलवाट, त्यातच जंगली प्राण्यांची भिती असून पावसाळ्यात दोन दोने नद्या चालत पार कराव्या लागतात. असा हा दिवसाचा ८ किलोमिटरचा जीवघेणा प्रवास या दोन शिक्षिकांना करावा लागतो. राज्यातील जवळ जवळ १५ हजार शिक्षकांना अशाच जीवघेणा भागातून प्रवास कराव लागतो.
हे पण वाचा, उद्धव बेटा, मला तुला भेटायचं; ‘त्या’ महिलेला राज ठाकरेंचा फोन
दरम्यान, या दोन शिक्षिकांमधील एका शिक्षिकेच्या सासऱ्यांचं निधन झालं. त्यावेळी त्या शाळेत होत्या. त्यांच्या फोनला नेटवर्क नसल्यामुळे भावकितली ४ माणसं निरोप देण्यासाठी शाळेच्या दिशेनं निघाली. ज्यावेळी ही मंडळी जंगलातून जात होती त्यावेळी नेमका रस्ता चुकली. संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर त्या महिला शिक्षिका ज्यावेळी नेटवर्कमध्ये आल्या त्यावेळी त्यांना सासऱ्यांच्या निधनाची बातमी कळाली. शिवाय निरोप पोहचायला उशीर का झाला याची चौकशी केली असता निरोप सांगायला आलेली माणसं जंगलात चुकली असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे सासऱ्यांच्या अंत्यविधीला जावं की या मंडळींना शोधावं असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला होता, असे याबाबत महिला शिक्षिका आपले मत मांडले.
या शिक्षिकांचा वनवास कधी थांबणार?
बरेच शिक्षक-शिक्षिका अती दुर्गम भागात, जंगलात अडकल्याच्या घटना घडू लागल्या. त्यामुळे त्यांच्याबद्दल २०१७ साली ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी महिला शिक्षिकांसाठी एक निर्णय घेतला होता. २०१९ मध्ये तीन पक्ष एकत्र येवून महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. आणि या सरकारने दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील शिक्षकांबद्दल जिल्हास्थरावर नवी नियमावाली जाहीर करून त्यांच्या शिक्षिकांच्या बदल्यांचा पुरता बोजवारा उडवला आहे. काहीही करा परंतू आम्हाला ह्या जीवघेण्या प्रवासातून मोकळे करा, आमची बदली करा, अशी मागणी शिक्षिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे, या शिक्षिकांचा वनवास कधी थांबणार?, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Read Also :
- आव्हाडांनी घेतली फडणवीसांची भेट! मुख्यमंत्र्यांना देखील नाही कल्पना
- परमबीर सिंग प्रकरणी अजित पवारांचीही सीबीआय चौकशी करा! भाजप कार्यकारिणीत प्रस्ताव मंजूर
- “काँग्रेसचा स्वबळाचा आग्रह शेवटपर्यंत टिकला, तर…” जयंत पाटलांचे नवीन आघाडीवर मोठे भाष्य
- बुलढाण्यातील राजकीय समीकरणे लवकरच बदलणार? प्रसेनजीत पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
- बाळासाहेबांचं नाव दिल्याने कामं वेगात पूर्ण होत असतील, तर या प्रकल्पालाही त्यांचंच नाव द्या!