नागपुर : येत्या ०४ जून रोजी जो निकाल येईल, त्यानंतर अनेकजण जे आमच्यापासून दुर गेले होते. ते पुन्हा येण्यासाठी प्रयत्न करू शकतात. असा दावा शरद पवार गटातील माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. तसेच, मात्र आमच्या पक्षाने ठरवलं आहे की, जे आम्हाला कठिण काळात सोडून गेले, त्यांना पुन्हा पक्षात घ्यायचं नाही. ०४ जूननंतर काय होईल ते पाहा. असाही इशारा अनिल देशमुख यांनी दिलाय.
हेही वाचा…“पुण्यातील कार अपघाताच्या निषेधार्थ निंबध स्पर्धा”, विषय वाचून हैराण व्हाल
४ जूननंतर रोजी लागणाऱ्या निकालानंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी आमच्या पक्षात येणाऱ्यांच्या रांगा लागल्याशिवाय राहणार नाहीत. तसेच ०४ जूननंतर महाराष्ट्रात चमत्कार घडणार असून महाविकास आघाडी ३५ जागा जिंकेल, असेही ते म्हणाले. यातच अनिल देशमुख यांनी त्यांच्या निवासस्थानी महाराष्ट्रात चमत्कार घडेल असा बोर्डही लावला आहे. त्यावर ते बोलत होते.
हेही वाचा..“जरांगे पाटलांच्या विरोधामुळे उमेदवारी टळली, नाहीतर…”भुजबळांचं मोठं विधान
दरम्यान, पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात विदर्भात निवडणुका झाल्या. त्यामुळे मी आधी विदर्भात चमत्कार घडेल असा बोर्ड लावला होता. त्यानंतर जेव्हा महाराष्ट्रातील पाचही टप्प्यातील निवडणुका झाल्या. त्यानंतर ज्या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये दिसत आहे. त्यामध्ये महागाईचा प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न, शेतकऱ्यांचा प्रश्न, कापूस, सोयाबीन, कांदा, संत्रा असे अनेक प्रश्न होते. त्यामुळे ज्या प्रकारचे वातावरण महाराष्ट्रात होतं. या अनुषंगाने महाराष्ट्रात चमत्कार घडणार अशा प्रकारची परिस्थिती असल्यामुळे हा बोर्ड लावला आहे. हा चमत्कार आकड्याच्या भाषेत सांगायचं झालं तर ३५ पेक्षा जास्त जागा महाविकास आघाडीच्या येतील. असा दावाही त्यांनी केलाय.
READ ALSO :
हेही वाचा..विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप अन् मनसे आमनेसामने, कोण जिंकणार ?
हेही वाचा..अग्रवाल कुटुंबीय कायद्याच्या कचाट्यात चांगलेच अडकले, दुसरी तक्रार दाखल, प्रकरण काय ?
हेही वाचा…“फक्त ससूनमधील डॉक्टरच नव्हे, त्या रात्री अनेकांनी आपले ईमान विकले, जे हळू हळू समोर येतील”
हेही वाचा…“पुण्यातील कार अपघाताच्या निषेधार्थ निंबध स्पर्धा”, विषय वाचून हैराण व्हाल