मुंबई : महाराष्ट्रातील सर्वात मोठा वेदांत प्रकल्प गुजरातला गेल्याने विरोधकांनी राज्यात रान पेटवलं आहे. विरोधक सत्ताधारी पक्षांवर तुटून पडले आहेत. यातच शिंदे सरकारवर टिका करताना आदित्य ठाकरेंनी यांनी सध्या राज्यात खोक्यांचं सरकार असल्याचं म्हटलं होतं. त्यावर आता शिंदे गटातील बंडखोर आमदार रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
आदित्य ठाकरे यांचं सध्या खोका-खोका सुरू आहे. मात्र, मातोश्रीला खोका हा विषय काही नवीन नाही. आम्ही त्याला साक्षीदार आहोत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी भान ठेऊन बोलावं. महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे. खोक्याचे राजकारण हे फक्त आमच्या आमदारांना बदनाम करण्यासाठी आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंचे आरोप हे बालिशपणाचे लक्षण आहेत असं रामदाक कदम यांनी म्हटलं आहे.
“राज्यात उलटा प्रवास सुरु होणं हे चांगलं लक्षण नाही?”; राज ठाकरेंनी शिंदे सरकारला फटकारलं
शिंदे भाजप सरकार सत्तेत येऊन दोन महिने झाले. त्यामुळे वेदांता प्रकल्प शिंदे सरकारच्या चूकीने महाराष्ट्रातून गेला, असं तुम्ही कसं म्हणू शकता? उलट मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे यासंदर्भात चौकशी करण्याची मागणी केली आहे. मुळात आदित्य ठाकरेंना याबाबत बोलण्याचा अधिकार नाही. मागचं सरकार आदित्य ठाकरे चालवत होते. त्यामुळे उद्योग मंत्री सुभाष देसाई होते. त्यामुळे एकनाथ शिंदेंना बदनाम केल्यापेक्षा त्यांनी सुभाष देसाई यांना याबाबत विचारावं. असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.
Read also
- “ही वेळ ‘एकदम ओक्के’ म्हणण्याची नसून कृती करण्याची आहे”; राष्ट्रवादीने शिंदेंना फटकारलं
- “काँग्रेसने भारत जोडो यात्रा सुरू केली, मात्र गोव्यात काँग्रेस छाडो यात्रा सुरू झाली आहे”; प्रमोद सावंत
- “लक्षात ठेवा…! राज्यात अस्सल हिंदुत्ववाद्यांचं सरकार आहे”; तुषार भोसले
- “माझी अक्कल काढली, तरी मला फारसं वाईट वाटत नाही”; पेडणेकरांना बावनकुळेंचं प्रत्युत्तर
- सेनेची जागा आता भाजप घेणार..! रिक्त झालेल्या जागेवर भाजपचा दावा, सेना-भाजपमध्ये रस्सीखेस