माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी असताना इकडे आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होण्याचे षडयंत्र रचत होते. त्यासाठी आदित्य ठाकरे यांनी जसलोक रुग्णालयाच्या एका खोलीत बैठकाही घेतल्या होत्या. पण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोध केला म्हणून आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न भंगले, असा खळबळजनक दावा भाजप (BJP) नेते आणि आमदार नितेश राणे यांनी केला आहे. आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा दावा केला.
हेही वाचा… शिवसेना भवन कुणाचे? ठाकरेंच्या संपत्तीवरील याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे मोठं पाऊल
यावेळी नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तुमच्या मालकाच्या मुलाला बघून जेव्हा मी म्याऊ म्याऊ असा आवाज काढला होता. तेव्हा तुमच्या मालकाला बर्नोल का लावावे लागले? त्या रागापोटी दीड महिने माझ्यावर खोटी केस टाकून मला पोलीस कोठडीत का टाकण्यात आले? तुमच्या मालकाचा मुलगा वाघाची डरकाळी देतो का? मग त्यांना बघून म्याऊ म्याऊ न करता वाघाची डरकाळी फोडायची का? असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित करत आदित्य ठाकरेंवर टीका केली.
हेही वाचा… अजितदादा सोबत येणार असतील तर…, शिवसेनेने घातली मोठी अट!
संजय राऊत हे नेमके काय बोलतात ते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि विनायक राऊतांनी त्यांच्या घरी जाऊन ऐकावे. त्यांच्या मनाचं परिवर्तन होतंय का ते बघा, ते लोकांची भूमिका मांडत आहेत. उद्धव ठाकरेंचे आदेश त्यांच्या मातोश्रीवरील शिपाई सुद्धा मानत नाहीत. शिपाई सोडा आदित्य ठाकरे तरी त्यांचे आदेश मानतात का? जेव्हा उद्धव ठाकरे हे मानेवरील शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णालयात दाखल होते. तेव्हा आदित्य ठाकरे, वरूण सरदेसाई आणि त्यांची टोळी दाओसच्या नावाने मजा मारत होते. माझ्या वडिलांची तब्येत बरी होणार नाही, म्हणून आदित्य ठाकरेंनी स्वत: मुख्यमंत्री होण्याचे षडयंत्रर चले. तेव्हा त्यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेसने त्याला विरोध केला. त्यामुळे हे सर्व प्रकरण थांबले आणि आदित्य ठाकरेंचे स्वप्न भंगले, असे म्हणत नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले
Read also
हेही वाचा… ठाकरे गटाचा शिंदे गटाला दणका, मंत्री संजय राठोडांचा उडवला धुरळा
हेही वाचा… ‘मलाही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्यात रस’, आता आठवलेंचाही थेट दावा
हेही वाचा… धनंजय मुंडेंचा पंकजांना मोठा धक्का; अंबाजोगाईत ‘मविआ’चा दणदणीत विजय
हेही वाचा… “सोनिया गांधी म्हणजे विषकन्या, भरसभेत भाजपच्या नेत्याची जीभ घसरली”