मुंबई : राज्यातील कोरोनारुग्णांची संख्या गेल्या काही दिवसात कमी झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र असे असले तरीही या आजाराचे संकट अद्याप कायम आहे. आषाढी वारी सोहळ्यावर देखील या संकटाचे सावट पाहायला मिळत आहे. यावर्षी देखील सरकारने वारीसाठी काही निर्बंध घातले आहे. यंदा मानाच्या दहा पालख्यांनाच आषाढी वारी सोहळ्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
यावर्षी देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी 100 व उर्वरित आठ सोहळ्यासाठी प्रत्येकी 50 वारकऱ्यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येईल, असं आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने स्पष्ट केलं आहे. मानाच्या पालखी सोहळ्यांना पायी वारी प्रस्थान ठिकाणापासून विशेष वाहनाद्वारे वाखरी येथे पोहोचल्यानंतर तेथून पंढरपूरकडे 1.5 किमी. अंतर प्रातिनिधिक स्वरूपात पायीवारी करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
महाद्वार काला उत्सवासाठी व संत नामदेव महाराज समाधी सोहळा 1 + 10 व्यक्तींसह सामाजिक अंतर राखून व योग्य ती खबरदारी घेऊन साजरा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. एकादशीच्या दिवशींच्या रथोत्सवासाठी रथाऐवजी मंदिराच्या स्वतंत्र वाहनाने 10 मानकरी आणि मंदिर समितीचे पाच कर्मचारी अशा 15 व्यक्तींसह सामाजिक अंतर राखून आणि योग्य ती खबरदारी घेऊन सोहळा साजरा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. वारकरी संख्येच्या निकषानुसार संतांच्या पादुका भेटीसाठी, मानाच्या पालखीसाठी 40 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. यावर्षी दोन बस व प्रत्येकी बसमध्ये 20 प्रमाणे 40 संख्या निश्चित केली आहे. गोपाळकालासाठी मानाच्या पालखी सोहळयाला 1 + 10 या प्रमाणात गोपाळपूर येथे भजन व कीर्तनास परवानगी देण्यात आली आहे.
आषाढी एकादशी दिवशी 20 जुलै 2021 रोजी स्थानिक महाराज अशा 195 मंडळींना श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे मुखदर्शन घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबत त्यांना वेळ व प्रवेशपत्रिका देण्याबाबतची कार्यवाही मंदिर समितीने करावयाची आहे.
Read Also :
- ‘नाना, काँग्रेसला हे दोन्ही पक्ष भीक तरी घालतात का?’
- ‘राम मंदिराच्या नावाने चंदा, हाच भाजप आणि आरएसएसचा धंदा’
- ‘दोन्ही राजे एकत्र आल्याचे स्वागत, पण त्यांचं बोलणं भाजपच्या मिठाला जागल्यासारखं’
- ‘मराठा समाजासोबतच दोन्ही राजेंनी ओबीसींच्या हक्कासाठी सुद्धा पाठिंबा द्यावा’
- केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलांच्या चर्चा, प्रीतम मुंडेंची मंत्रीपदी वर्णी लागणार ?