पुणे : सध्या महाराष्ट्रात नगरपंचायत निवडणुकींचा बिगुल वाजला आहे. राज्यात सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष असा संघर्ष आता राज्यात पाहायला मिळणार आहे. नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता राज्यात राजकारण चांगलेच तापले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख कोण? उद्धव ठाकरे की अनिल परब? रामदास कदमांचा हल्लाबोल
नगर पंचायत निवडणुकांच्या निमित्ताने बीड जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या माजी मंत्री आणि नेत्या पंकजा मुंडे विरुद्ध सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यातील संघर्ष उफाळून आला आहे. धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे आणि भाजपवर तोफ डागली आहे. नगर पंचायत निवडणुकींमध्ये भारतीय जनता पक्षासारख्या राष्ट्रीय पक्षाला बीडमध्ये साधा उमेदवारही देता आलेला नाही.
रामदास कदमांच्या गंभीर आरोपांवर अनिल परब यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
बीड जिल्ह्याच्या विकासासाठी कोणीही कितीही प्रयत्न केले नाहीत. बीड जिल्हा हा पूर्वी ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखला जायचा. १४ डिसेंबर २०१४ रोजी स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या नावाने ऊसतोड महामंडळ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली. मात्र भाजपची सत्ता असताना देखील महामंडळाची स्थापना करण्यात आली नाही. आज सत्ता गेल्यानंतर त्यांना ऊसतोड मजुरांची आठवण येत आहे, अशा शब्दांत त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली आहे. पंकजा मुंडे यमाई नुकतीच महाराष्ट्र दौऱ्यावर जाण्याची घोषणा केली होती. त्यावरून धनंजय मुंडेंनी पंकजांवर निशाणा साधला आहे.
Read also:
- देवेंद्र फडणवीसांमधील संयम हा गुण शिकण्यासारखा; पंकजामुंडेचे फडणवीसांविषयी स्तुतीसुमने
- उद्धव ठाकरेत हिम्मत असेल तर राजीनामा द्यावा, अन्…; अमित शहांच मुख्यमंत्र्यांना खुलं आव्हान
- ‘‘गाल पाहणाऱ्यांचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही’’ गुलाबराव पाटलांना चित्रा वाघ यांचा इशारा
- महाराष्ट्राची भूमी सहकार क्षेत्रासाठी काशीइतकीच पवित्र – केंद्रिय मंत्री अमित शाह
- छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना होणं, ही छोटी गोष्ट; मुख्यमंत्र्याचा संतापजनक वक्तव्य