बीड : भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाद मागील काळात संपूर्ण महाराष्ट्राने पहिला होता. मागील काही दिवसांमध्ये देखील पंकजा मुंडे यांनी फडणवीसांना धारेवर धरण्याचे किंवा राजकीय टोले मारण्याचे काम केले होते. आता मात्र या दोन्ही नेत्यांमधील वाद काहीसे संपुष्टात आल्याचे चित्र समोर आले आहे. आज पंकजा मुंडे यांनी फडणवीसांचे तोंडभरून कौतूक केले आहे. एक प्रकारे फडणवीस-मुंडे यांच्यातील वादावर आता कुठेतरी पडदा पडला आहे असं म्हणायला हरकत नाही.
शिवसेना पक्षप्रमुख कोण? उद्धव ठाकरे की अनिल परब? रामदास कदमांचा हल्लाबोल
पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे की, देंवेंद्र फडणवीसांसारखा संयम सर्वांनीच आपल्या अंगीकारला पाहिजे. काही लोक देवेंद्र फडणवीसांकडे जागा वाटपासाठी गेले होते. त्यावेळी फडणवीसांनी आपले काम हे कमालीच्या शांततेत केले. त्यांच्याकडे असणारा संयम हा गुण शिकण्यासारखा आहे. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी फडणवीसांना एक फॉर्मुल्या देखील सांगितला आहे. पंकजांनी फॉर्मुल्याबद्दल बोलताना म्हटले आहे की ५०% जागा दिल्या तर समोरच्याचाच विजय होत असतो. एकाला आष्टीत आणि दुसऱ्याला पाटोद्यात उभे करा. शिरूरमध्ये देखील युती करा असं देखील त्यांनी सुचवलं आहे.
रामदास कदमांच्या गंभीर आरोपांवर अनिल परब यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
मी स्वर्गीय गोपनाथरावांची कन्या आहे. साहेबांनी मला बेरजेचे राजकारण शिकवले. मात्र बीड जिल्ह्याच्या राजकारणात प्रवेश केल्यानंतर मी गुणाकाराचे राजकारण शिकले आहे. बीड जिल्ह्याचे रस्ते बघता बघता मला आता मणक्याच्या आजाराने घेरले आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये बीडला थोडाही निधी इथल्या पालकमंत्र्यांनी दिलेला नाही असं म्हणत पंकजांनी धनंजय मुंडेंना टोला हाणला आहे.
Read also:
- …तेव्हा फडणवीसचं मुख्यमंत्री होतील असं ठरलं होतं, शिवसेनेनेच सत्तेसाठी वचन मोडले – अमित शहा
- उद्धव ठाकरेत हिम्मत असेल तर राजीनामा द्यावा, अन्…; अमित शहांच मुख्यमंत्र्यांना खुलं आव्हान
- ‘‘गाल पाहणाऱ्यांचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही’’ गुलाबराव पाटलांना चित्रा वाघ यांचा इशारा
- महाराष्ट्राची भूमी सहकार क्षेत्रासाठी काशीइतकीच पवित्र – केंद्रिय मंत्री अमित शाह
- छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना होणं, ही छोटी गोष्ट; मुख्यमंत्र्याचा संतापजनक वक्तव्य