मुंबई : केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे मागे घेणार असल्याची घोषणा आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. त्यानंतर देशभरातून वेगवेळ्या प्रतिक्रीया उमटत आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या निर्णयाचं स्वागत करताना केंद्र सरकारवर टीका देखील केली आहे. संजय राऊत यांनी यावेळी केंद्र सरकारने हे आधीच आंदोलन मागे घेतले असते तर शेतकऱ्यांचे मृत्यू झाले नसते, असं सांगितलं आहे.
देशातील 25 राज्यांनी पेट्रोलचे भाव कमी केले, महाराष्ट्रात अजून का नाही? – देवेंद्र फडणवीस
भाजप नेते प्रविण दरेकर यांनी यावेळी संजय राऊतांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. राज्यातील एसटी कर्मचारी सुद्धा आंदोलन करताय, तो कर्मचारी न्याय मागतोय, त्यामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनाप्रमाणे हे कामगारांचं आंदोलन होऊ नये असं वाटत असेल तर त्यांचा प्रश्नावर सुद्धा तोडगा काढा असं ते म्हणाले आहे.
अनिल देशमुखांविरोधातील तपासात राज्य सरकारचे अडथळे; सीबीआयचा गंभीर आरोप
राज्यात सध्या एसटीच्या कर्मचाऱ्यांनी मोठा संप उगारला आहे. दिवसेंदिवस हा संप चिघळत आहे. भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठींबा दिलेला आहे. एसटीचे विलगीकरण करण्यात यावे आणि कर्मचाऱ्यांची पगारवाढ व्हावी अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी आणि संघटनांनी घेतली आहे. माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर हे स्वतः मैदानात उतरलेले आहेत आणि मोर्चेकऱ्यांसोबत राहत आहेत. आर्थिक तिजोरीतील गडगडाटामुळे गटांगळ्या खात असलेल्या एसटी महामंडळाला बाहेर काढण्यासाठी केपीएमजी संस्थेची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यातच आता मोदींनी कृषी कायदे मागे घेतले आहेत. त्यामुळे सरकराने एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावावा, अशा शब्दात विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सरकारला साकडं घातलं आहे.
Read Also :
- एसटी महामंडळाचे खासगीकरण होणार ही तर एक अफवा – माजी मंत्री सदाभाऊ खोत
- सात वर्षात पहिल्यांदाच मोदी सरकारनं पाय मागे घेतलाय; नवाब मलिकांची संतप्त प्रतिक्रिया
- मोदी सरकार देर आये, दुरुस्त आये; शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय – अमोल कोल्हे
- पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मोठी घोषणा; वादग्रस्त तीनही कृषी कायदे रद्द
- योगेश बहल यांचे राजकारण : विरोधात गेल्या दोन बायका अन् फजिती ऐका !