पुणे : आगामी सहा महिन्यानंतर राज्यात प्रमुख समजल्या जाणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. त्याकरिता आतापासूनच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने जोरदार तयारी केली आहे. शिवसेनेने औरंगाबाद, मुंबई तर राष्ट्रवादीने पुणे महानगर पालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची करण्याची ठरवले आहे.
महाविकास आघाडी सरकार पडणार नाही, जोपर्यंत..; रामदास आठवले यांचं खळबळजनक वक्तव्य
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून लोकपयोगी कामांच्या उदघाट्नचे अनेक कार्यक्रम सुरु करण्यात आले आहेत. आज वडगाव शेरी ऑक्सीसन पार्क उद्यानाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्याच्या पर्यावरण राज्यमंत्री आदिती तटकरे , राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार सुनील टिंगरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
भिंतीवरच्या घड्याळ्यानेच काढला काटा! फडणवीसांच्या आरोपांवर वकिल प्रवीण चव्हाणांचा खुलासा
आजकाल कोण काय बोलतोय, कोण काय करतोय, आपण ज्याच्याबद्दल बोलतोय त्याच्याबद्दल बोलायची आपली पात्रता नक्की आहे का ? हे ज्याला त्याला कळलं पाहिजे. कोणी काहीही बोलत सुटलंय असा टोलाही त्यांनी कोणाचाही नाव न घेता हाणला आहे. टाळी एका हाताने वाजत नाही. दोन्ही बाजूच्या चूका आहेत. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. लोकांना हे राजकारण आवडत नाही. लोक विकासाबाबत आपल्याला कोण मदत करेल हे पाहतात. राजकारण करताना लोकांनी आता विचार बदलायला हवेत असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
अजित पवार बोलत असताना अचानक अजान सुरु झाली आणि अजित दादांनी २ ३ मिनिटांसाठी आपलं भाषण थांबवलं. अजान होईपर्यंत अजित दादांनी आपलं भाषण केलं नाही. यामुळे उपस्थितांमध्ये बऱ्याच चर्चा रंगल्या. हिंदुत्ववादी पक्ष असणाऱ्या शिवसेनेशी राष्ट्रवादीची युती आहे, अजित पवारांनी आज जे काही केलं ते म्हणजे सर्व धर्म समभाव या तत्वानुसार होतं. अजानच्या बाबतीत शिवसेनाप्रमुखांनी जे एकदा संभाजीनगरमध्ये केलं होतं ते आठवल्यास हे एकदम विरुद्ध होतं असं एखाद लहान मुलंही सांगेल. आता शिवसेना आणि भाजप या गोष्टीला कसं घेणार हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.
Read also:
- फडणवींसाना आरोपी म्हणून नोटीस पाठवली नाही; दंगा करण्याची काय गरज दिलीप वळसे पाटील
- राज्यांत पोलीस बदल्यांचा महाघोटाळा! घोटाळा दाबण्याचा सरकारचा प्रयत्न; देवेंद्र फडणवीस
- उद्या प्रत्येक जिल्ह्यात नोटिशीची होळी करणार: प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मोठी घोषणा
- आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत मलिकांचा राजीनामा नाहीच! जयंत पाटलांनी आता स्पष्टच केलं
- फडणवीसांना पोलीस ठाण्यात येण्याची आवश्यकता नाही; घरीच चौकशी करणार : मुंबई पोलीस