मुंबई : फोन टँफिंग आणि पोलीस बदल्यांच्या प्रकरणावरून सध्या राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची चौकशी सुरू आहे. त्यासंदर्भात त्यांना बीकेसीच्या पोलिसांकडून नोटीसही बजावण्यात आली आहे. त्यांना बीकेसीच्या पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले होते, परंतु घरीच चौकशी करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. याच पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भिंतीवरच्या घड्याळ्यानेच काढला काटा! फडणवीसांच्या आरोपांवर वकिल प्रवीण चव्हाणांचा खुलासा
दिलीप वळसे पाटील म्हणाले की, राज्य गुप्तवार्ता विभागाची माहिती गहाळ झाल्यानंतर अज्ञात पाच व्यक्तींविरोधातहा गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई सायबर पोलीस ठाण्यात यासंदर्भात 26 मार्च रोजी गुन्हा नोंद करण्यात आला. याबाबत आजपर्यंत 24 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. गुन्ह्याच्या संदर्भात तपास करण्याच्या दृष्टीकोनातून ज्यांचा याप्रकरणाशी संबंध आहे त्यांचा जबाब घेणे हे कायद्याने बंधनकारक आहे.
देवेंद्र फडणवीस यांना नोटीस पाठवल्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली. यावर बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, एखाद्या प्रश्नाचे राजकीय भांडवल करणे हे राजकारणात सुरुच असते. त्याप्रमाणे भाजप करत आहे. यामध्ये दंगा करण्यासारखं काहीच नाही. देवेंद्र फडणवीस यांना आरोपी म्हणून नोटीस पाठवण्यात आली नाही. तर एका वर्षापासून तपास थांबला असल्याने त्यांना नोटीस पाठवण्यात आली. मुंबई पोलीस एसआयडी मधून माहिती बाहेर कशी गेली याचा तपास करत आहेत. त्या पेन ड्राईव्हमध्ये काय आहे चौकशी सीबीआय करत आहे.
त्यांनी या वयात अशी हास्यास्पद विधानं करू नये; कुमार केतकरांच्या वक्तव्याला फडणवीसांचं प्रत्युत्तर
दरम्यान, राज्यांत पोलीस बदल्यांचा महाघोटाळा झाला असून त्यासंदर्भात केंद्रीय गृह सचिवाला मी माहिती दिली आहे. त्यानंतर उच्च न्यायालयाने या घोटाळ्याची चौकशी सीबीआयकडे सोपवली. त्यावर आता सर्वोच्च न्यायालयाने देखील घोटाळा झाल्याचा शिक्कामोर्तब केला आहे. मात्र या घोटाळ्याची चौकशी सरकार करू शकत नाही. जर हा घोटाळा काढला नसता, तर कोट्यवधी रूपयांचा घोटाळा दबुन गेला असता. असा खळबळजनक दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
Read also:
- राज्यांत पोलीस बदल्यांचा महाघोटाळा! घोटाळा दाबण्याचा सरकारचा प्रयत्न; देवेंद्र फडणवीस
- उद्या प्रत्येक जिल्ह्यात नोटिशीची होळी करणार: प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मोठी घोषणा
- आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत मलिकांचा राजीनामा नाहीच! जयंत पाटलांनी आता स्पष्टच केलं
- फडणवीसांना पोलीस ठाण्यात येण्याची आवश्यकता नाही; घरीच चौकशी करणार : मुंबई पोलीस
- महाविकास आघाडी सरकार पडणार नाही, जोपर्यंत..; रामदास आठवले यांचं खळबळजनक वक्तव्य