मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावरून सध्या राज्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. विरोधी पक्षांकडून नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. अशातच आता राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नवाब मलिक यांच्यावर जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत राजीनामा घेणार नाहीत, असा पुन्हा एकदा सांगितलं आहे. त्यामुळे राजकारण चिघळण्याची शक्यता आहे.
घोटाळेबाजांना उघड करण्याचा किरीट सोमय्याचा गुन्हा करत असेल, तर एक हजार वेळा करणार
जयंत पाटील म्हणाले की, विरोधक नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी अधिवेशन सुरू झाल्यापासून करत आहेत. परंतु मलिक यांच्यावर कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाहीत. तसेच अनिल देशमुख यांच्याबाबत त्यांनी राजीनामा स्वत:हून दिला. त्यानंतर देशमुखांवर अनेक गुन्हे लावण्यात आले. ९५ वेळा त्यांच्या विविध निवास ठिकाणी छापे मारणे सुरू आहे. या सर्व गोष्टी जाणीवपूर्वक होत आहेत ही धारणा सर्वांची झाली आहे असे जयंत पाटील म्हणाले.
सरकारने घोटाळा दाबण्याकरता गुन्हा दाखल केला; उद्या बीकेसीच्या सायबर सेलमध्ये हजर राहणार : फडणवीस
नवाब मलिक यांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळाली असती तर ते समजूत घालू शकले असते, पण त्यांनाही अटक करण्यात आली. त्यांना उलट माहिती देऊन स्पष्टीकरण देण्याची संधी द्यायला हवी होती. त्यामुळे त्यांचे राजीनामे आम्ही घेत बसणे योग्य नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.
बच्चू कडू सर्वांचा बाप! उद्याच मंत्रिपदाचा राजीनामा देतो; बच्चू कडू यांचं वक्तव्य
तसेच देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांंनी नोटीस पाठवल्यानंतर त्यावर बोलताना म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार अशाप्रकारचे सुडाचे राजकारण शंभर टक्के करणार नाही असा दावा त्यांनी यावेळी केला. देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी केवळ माहीती घेण्यासाठी बोलवले असावे. त्यांच्यावर कोणतीही कारवाई करून त्यांना अडचणीत आणण्याचा हेतू राज्य सरकारचा मला दिसत नाही, असे जयंत पाटील म्हणाले.
Read also:
- फडणवीसांना पोलीस ठाण्यात येण्याची आवश्यकता नाही; घरीच चौकशी करणार : मुंबई पोलीस
- महाविकास आघाडी सरकार पडणार नाही, जोपर्यंत..; रामदास आठवले यांचं खळबळजनक वक्तव्य
- भिंतीवरच्या घड्याळ्यानेच काढला काटा! फडणवीसांच्या आरोपांवर वकिल प्रवीण चव्हाणांचा खुलासा
- फडणवीसांना चौकशी दरम्यान नाहक त्रास दिला तर याद राखा! फडणवीसांना नोटीस आल्यानंतर पाटलांची प्रतिक्रिया
- त्यांनी या वयात अशी हास्यास्पद विधानं करू नये; कुमार केतकरांच्या वक्तव्याला फडणवीसांचं प्रत्युत्तर