मुंबई : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर एका मुलाखतीत काॅंग्रेसचे राज्यसभाचे खासदार कुमार केतकर यांनी काल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या निवडणुकानंतर महाराष्ट्रात भाजप सरकार पाडण्यासाठी वेगाने हालचाली करणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यावर आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कुमार केतकर यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
..तर तुम्ही मुंबईलाही केंद्रशासीत प्रदेश केलं असतं; युपी निकालांवरून रोहित पवारांचा भाजपला टोला
कुमार केतकर यांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कुमार केतकर हे ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक राहिले आहेत. त्यांना या वयात अशी हास्यास्पद विधानं करू नये. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर एका मुलाखतीत कुमार केतकर यांनी वक्तव्य केलं होतं. त्यावेळी भाजपचे खासदार प्रकाश जावडेकर देखील उपस्थित होते.
उधारीचा वायदा करणार अन् जबाबदारी टाळणारा राज्याचा अर्थसंकल्प
महाराष्ट्रातील सरकार स्थापन झालं त्या दिवसापासून मी हेच सांगतोय. तीन पक्षांचा सरकार आहे. ते वेगवेगळ्या यंत्रणा वापरत नाही. ते प्रमाणिक लोक आहेत. त्यांच्या घरी छापे टाकत नाहीत. यांचं उदाहरण सांगायचं झाल्याचं नारायण राणे यांचं नाव घेता येईल. महाराष्ट्रातील सरकार कोणत्याही क्षणी जाऊ शकेल. याठिकाणी आपण बोलत आहोत परंतु तिकडे सरकारला सुरूंग लावण्याची तयारी सुरू झालेली असेल. असं चर्चा सत्रात विचारलेल्या प्रश्नांवर कुमार केतकर यांनी उत्तर दिलं आहे.
सर्वच क्षेत्रात विकासाची मोठी भरारी घेणारा अर्थसंकल्प मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
आगामी काही काळात मुंबई, ठाणे, पुणे, आणि नाशिक या प्रमुख शहरात महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकारण चांगलचं तापलेलं दिसून येत आहे. तसेच विरोधी पक्षांकडून महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याचं वक्तव्य केलं जात होतं. परंतु सरकार अजूनही स्थिर आहे.
Read also:
- घोटाळेबाजांना उघड करण्याचा किरीट सोमय्याचा गुन्हा करत असेल, तर एक हजार वेळा करणार
- सरकारने घोटाळा दाबण्याकरता गुन्हा दाखल केला; उद्या बीकेसीच्या सायबर सेलमध्ये हजर राहणार : फडणवीस
- बच्चू कडू सर्वांचा बाप! उद्याच मंत्रिपदाचा राजीनामा देतो; बच्चू कडू यांचं वक्तव्य
- पवार साहेबच महाराष्ट्रात दाऊदचा माणूस! देशमुखांचा राजीनामा झटपट कसा घेतला निलेश राणेंचा सवाल
- केंद्रीय समितीचा आदेश येताच गोव्यात सरकार स्थापन करणार