मुंबई : दाऊद इब्राहिम यांच्या संंबंधीत जमीन व्यवहार केल्याप्रकरणी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक सध्या तुरुंगात आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. विरोधी पक्षांकडून नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अशातच आता भाजप नेते निलेश राणे यांनी नवाब मलिक प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
फक्त तोंडाला पान पुसण्याचं काम सरकारने केलंय! 2022 च्या अर्थसंकल्पावर फडणवीसांची प्रतिक्रिया
निलेश राणे यांनी शरद पवार यांच्या बद्दल खळबळजनक वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, मला आता संशय येतोय की, पवार साहेबच महाराष्ट्रात दाऊदचा माणूस आहे. अनिल देशमुख यांनी काय केलं होतं ? त्यांचा राजीनामा कसा झटपट घेतला होता. तेव्हा विचार केला होता का? असा सवाल देखील निलेश राणे यांनी विचारला आहे.
अजित दादांचं मराठी प्रेम! यंदाच्या अर्थसंकल्पात मराठी भाषा भवनासाठी 100 कोटींची तरतुद
निलेश राणे अजूनही काही प्रश्न उपस्थित केले आहेत. मग नवाब मलिक कोण आहेत ? नवाब मलिक शरद पवार यांचे कोण लागतात? ज्यांनी व्यवहार केला. ज्यांनी दाऊदच्या बहिणीला पैसे दिले. दाऊदच्या माणसाला पैसे दिले. बॉम्ब स्फोटातील आरोपीला पैसे दिले, असं खळबळजनक वक्तव्य निलेश राणे यांनी केले आहे. त्यामुळे आता राज्यात राजकीय वाद वाढण्याची शक्यता आहे.
अर्थसंकल्प 2022! एसटी आंदोलनावर यंदाच्या अर्थसंकल्पात तात्पुरती मलमपट्टी; वाचा
सत्ताधारी पक्षांकडून नवाब मलिक यांना भक्कम पाठिंबा दिला आहे. तर विरोधी पक्ष महाविकास आघाडीवर आणि नवाब मलिक यांच्यावर सातत्याने टीका करत आहे. तसेच गेल्या काही दिवसापासून नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपकडून जोरदार आंदोलने करण्यात येत आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय पक्षांमध्ये जोरदार संघर्ष बघायला मिळणार आहे.
Read also:
- केंद्रीय समितीचा आदेश येताच गोव्यात सरकार स्थापन करणार
- ..तर तुम्ही मुंबईलाही केंद्रशासीत प्रदेश केलं असतं; युपी निकालांवरून रोहित पवारांचा भाजपला टोला
- उधारीचा वायदा करणार अन् जबाबदारी टाळणारा राज्याचा अर्थसंकल्प
- अर्थसंकल्प 2022! पुणे जिल्ह्यांसाठी अजित दादांनी दिलं भरभरून निधी
- सर्वच क्षेत्रात विकासाची मोठी भरारी घेणारा अर्थसंकल्प मुख्यमंत्री उद्धव ठाकरे