मुंबई : गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तोफा या काहीशा थंड झाल्या. प्रमुख राज्ये उत्तर प्रदेश, पंजाब आणि गोवा राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आता समोर आले आहेत. भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळत पाच पैकी तीन राज्यांमध्ये विजय मिळवला आहे तर एका राज्यात मोठ्या संख्येने उमेदवार विजयी केले आहेत.
अजित दादांचं मराठी प्रेम! यंदाच्या अर्थसंकल्पात मराठी भाषा भवनासाठी 100 कोटींची तरतुद
गोव्यात भाजपाला २० जागांवर विजय प्राप्त झाला आहे. काँग्रेस पक्षाने ११ जागांवर विजय मिळवला आहे. गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून निवडणूक लढविण्यात आली होती. गोव्याचा निकाल लागताच देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यात धडक मारली आहे. गोव्यात बहुमतासाठी २१ जागांची गरज आहे. या ठिकाणी काँग्रेसचे ११, मगो २, आप २, गोवा फॉरवर्ड एक, तर तीन अपक्ष आघाडीवर आहेत. त्यामुळे गोव्यात भाजपचे पुन्हा सरकार येणार हे निश्चित आहे. आता मुख्यमंत्री कोण बनणार, याकडे मात्र जनतेचे लक्ष लागले आहे.
अर्थसंकल्प 2022! एसटी आंदोलनावर यंदाच्या अर्थसंकल्पात तात्पुरती मलमपट्टी; वाचा
देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना संबोधित करताना म्हटलं आहे की, गोव्याच्या जनतेने आमच्यावर विश्वास टाकला आहे. त्याला आम्ही कधीही तडा जाऊ देणार नाही. गोव्यात आम्ही जो विजय मिळवला आहे त्याबद्दल येथील जनतेचा मी आभारी आहे. आम्हाला बहुमत मिळाले असून अपक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमन्तक पक्ष यांना सोबत घेऊन आम्ही राज्यात चांगले आणि स्थिर सरकार देणार आहोत.
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची अवस्था काॅंग्रेससारखी होईल, त्यांनी भाजपसोबत यावे रामदास आठवले
गोव्यातील सरकार स्थापनेबद्दल फडणवीसांना विचारले असता त्यांनी सांगितलं आहे की याबाबतचा निर्णय भाजपची केंद्रीय समिती घेते. भाजपचे पार्लमेंटरी बोर्ड त्यासंदर्भातील निर्णय घेतात. ते जेव्हा आम्हाला सांगितील की, निर्णय झाला तेव्हा आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करणार आहोत.
Read also:
- ..तर तुम्ही मुंबईलाही केंद्रशासीत प्रदेश केलं असतं; युपी निकालांवरून रोहित पवारांचा भाजपला टोला
- उधारीचा वायदा करणार अन् जबाबदारी टाळणारा राज्याचा अर्थसंकल्प
- अर्थसंकल्प 2022! पुणे जिल्ह्यांसाठी अजित दादांनी दिलं भरभरून निधी
- सर्वच क्षेत्रात विकासाची मोठी भरारी घेणारा अर्थसंकल्प मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- फक्त तोंडाला पान पुसण्याचं काम सरकारने केलंय! 2022 च्या अर्थसंकल्पावर फडणवीसांची प्रतिक्रिया