मुंबई : आज अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा २०२२-२३ साठीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यावेळी अजित पवार यांनी पंचसुत्री कार्यक्रमावर भर दिला आहे. परंतु यंदाच्या अर्थसंकल्पात विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र कुठेच दिसत नसल्याची टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच काही केंद्र सरकारच्या योजना देखील अजित पवार यांनी बोलून दाखवल्या असल्याचं देवेद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
भाजपची कोणतीही लाट किंवा वादळ नाही! अमोल मिटकरींची भाजपवर खरमरीत टीका
अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले की, महाराष्ट्राच्या सर्व घटकांच्या तोंडाला पान पुसण्याचं काम या सरकारने केलं आहे. या अर्थसंकल्पात राज्याच्या विकासाला चालना देणार कोणतंही काम होऊ शकणार नाही. त्याचबरोबर त्यांनी आमच्याच योजना बंद करणाऱ्या सरकारनं त्या पुन्हा सुरू केल्या असल्याची टीकाही केली आहे. काही योजना सोडल्या तर समाजातील कोणत्याही घटकांना दिलासा मिळणार नाही, अशा योजनांची घोषणा सरकारने केली असल्याचे फडणवीसांनी सांगितले आहे.
महाराष्ट्रातील सत्तांतर अटळ, महाराष्ट्रात पर्यायी सरकार देऊ : देवेंद्र फडणवीस
शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पात काहीच दिलं नाही. आम्ही शेतकऱ्यांना कर्ज देत आहोत. असं म्हणणाऱ्या सरकारने कर्जमाफी दिलेल्या शेतकऱ्यांना नवीन कर्ज अद्यापही मिळालं नाही. कोरोना काळात सर्वोधिक रूग्ण मृत्यूमुखी पडलेल्या राज्याचं सरकार कशाच्या आधारावर पाठ थोपटून घेत आहे. हे पण मला समजत नाही. असंही ते म्हणाले.
आता पुढचं टार्गेट महानगरपालिका! विधानसभा निवडणुका निकालानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
दरम्यान, पुढे बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शिवसेना पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरून मोर्चा काढणार का ? असा सवाल देखील त्यांनी केला आहे. या अर्थसंकल्पाने सामान्य माणसांची निराशा केली आहे. तसेच केंद्र सरकारने सुरू केलेल्या काही योजनांची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. असंही त्यांनी सांगितले आहे.
Read also:
- अजित दादांचं मराठी प्रेम! यंदाच्या अर्थसंकल्पात मराठी भाषा भवनासाठी 100 कोटींची तरतुद
- अर्थसंकल्प 2022! एसटी आंदोलनावर यंदाच्या अर्थसंकल्पात तात्पुरती मलमपट्टी; वाचा
- महिला, शेतकरी, शेतमजूर सन्मान वर्ष म्हणून राबवण्यात येणार! वाचा यंदाचा अर्थसंकल्प
- देवेंद्र फडणवीस असे 10-20 पवार खिशात घालून फिरतात! गोपीचंद पडळकरांची जहरी टीका
- लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची अवस्था काॅंग्रेससारखी होईल, त्यांनी भाजपसोबत यावे रामदास आठवले