मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील सध्या अनेक नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक सध्या जमीन व्यवहार प्रकरणी तुरुंगात आहे. अशातच आता भाजप नेते किरीट सोमय्यांनी शिवसेना नेते आणि परीवहन मंत्री अनिल परब यांना सुचक इशारा दिला आहे. अनिल परब यांच्यावर बेनामी रिसोर्ट बांधल्याप्रकरणी किरीट सोमय्यांनी आरोप केला आहे.
उधारीचा वायदा करणार अन् जबाबदारी टाळणारा राज्याचा अर्थसंकल्प
किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात ट्विट केला आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, आता अनिल परबचा ही नंबर लागणार. अनधिकृत, बेनामी रिसोर्ट आणि रिसोर्ट बांधकाम साठी आलेला पैसा यासंबंधी चौकशी होणार. तसेच भारत सरकारने दापोली कोर्टात तक्रार दाखल केली आहे. याची सुनावणी 30 मार्च रोजी होणार आहे. त्यामुळे राज्यात आता राजकीय संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.
सर्वच क्षेत्रात विकासाची मोठी भरारी घेणारा अर्थसंकल्प मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
किरीट सोमय्या पुढे म्हणाले की, घोटाळेबाजांना उघड करणं हा जर किरीट सोमय्याचा गुन्हा असेल तर तो मी एक हजार वेळा करणार. किरीट सोमय्यांनी जर राजकीय बळाचा दुरूपयोग केला असेल तर माझ्या वर गुन्हा दाखल करा, असं मी या अगोदर देखील बोलुन दाखवलं आहे. नवाब मलिक यांच्या राजीनाम्याबद्दल बोलताना म्हणाले की, मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अडचण समजू शकतो. महाविकास आघाडीतील 16 नेत्यांचे घोटाळे सिद्ध झालेले आहेत. त्यामुळे जर सगळ्यांचेच राजीनामे घेतले तर सरकार अदृश्य होईल, असंही किरीट सोमय्या म्हणाले.
फक्त तोंडाला पान पुसण्याचं काम सरकारने केलंय! 2022 च्या अर्थसंकल्पावर फडणवीसांची प्रतिक्रिया
दरम्यान, मागील काही दिवसांत किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडी सरकारमधील डर्टी डझन मंत्र्यांची यादी जाहीर केली होती. त्यात यादीत अनेक मोठ्या नेत्यांच्या नावांचा समावेश होता. अशातच आता किरीट सोमय्यांनी अनिल परब यांना सुचक इशारा दिल्याने राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे.
Read also:
- सरकारने घोटाळा दाबण्याकरता गुन्हा दाखल केला; उद्या बीकेसीच्या सायबर सेलमध्ये हजर राहणार : फडणवीस
- बच्चू कडू सर्वांचा बाप! उद्याच मंत्रिपदाचा राजीनामा देतो; बच्चू कडू यांचं वक्तव्य
- पवार साहेबच महाराष्ट्रात दाऊदचा माणूस! देशमुखांचा राजीनामा झटपट कसा घेतला निलेश राणेंचा सवाल
- केंद्रीय समितीचा आदेश येताच गोव्यात सरकार स्थापन करणार
- ..तर तुम्ही मुंबईलाही केंद्रशासीत प्रदेश केलं असतं; युपी निकालांवरून रोहित पवारांचा भाजपला टोला