मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फोन टँफिंग आणि पोलीस बदल्यांच्या प्रकरणावरून चौकशी सुरू आहे. त्यासंदर्भात नोटीस आल्यानंतर बीकेसीच्या पोलिसांनी मला चौकशीसाठी बोलवलं असल्याचे तसेच त्यानंतर घरीच पोलीस अधिकारी येणार असल्याचे सांगितले होते. त्यासाठी त्यांनी आज पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केले. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर धक्कादायक आरोप केले आहेत.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यांत पोलीस बदल्यांचा महाघोटाळा झाला असून त्यासंदर्भात केंद्रीय गृह सचिवाला मी माहिती दिली आहे. त्यानंतर उच्च न्यायालयाने या घोटाळ्याची चौकशी सीबीआयकडे सोपवली. त्यावर आता सर्वोच्च न्यायालयाने देखील घोटाळा झाल्याचा शिक्कामोर्तब केला आहे. मात्र या घोटाळ्याची चौकशी सरकार करू शकत नाही. जर हा घोटाळा काढला नसता, तर कोट्यवधी रूपयांचा घोटाळा दबुन गेला असता. असाही खळबळजनक दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
त्यांनी या वयात अशी हास्यास्पद विधानं करू नये; कुमार केतकरांच्या वक्तव्याला फडणवीसांचं प्रत्युत्तर
तसेच ते पुढे म्हणाले की, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील जे म्हणाले त्याच्यात फरक काय आहे. मला जे प्रश्न पाठवले होते आणि आज जी चौकशी झाली, त्यात फरक आहे. ऑफिशिअल सीक्रसी अॅक्टचे उल्लंघन केल्याचा आरोप माझ्यावर केला जात आहे. जणू काही मला आरोपी-सहआरोपी बनवता येईल का, असे प्रश्न मला विचारण्यात आले. मी स्पष्टपणे त्यांना उत्तरे दिली. गोपनीय कायदा लागू होतो की नाही, यावर मी बोलणार नाही. मात्र, व्हिसल ब्लोअर अॅक्ट लागू झाला पाहिजे. मी व्हिसल ब्लोअर आहे.. न्यायालयाने मान्य केलेला घोटाळा आहे, असा दावा त्यांनी केला.
घोटाळेबाजांना उघड करण्याचा किरीट सोमय्याचा गुन्हा करत असेल, तर एक हजार वेळा करणार
दरम्यान राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर राजकीय घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप- प्रत्यारोपाची फैरी झाडत आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे.
Read also:
- उद्या प्रत्येक जिल्ह्यात नोटिशीची होळी करणार: प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मोठी घोषणा
- आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत मलिकांचा राजीनामा नाहीच! जयंत पाटलांनी आता स्पष्टच केलं
- फडणवीसांना पोलीस ठाण्यात येण्याची आवश्यकता नाही; घरीच चौकशी करणार : मुंबई पोलीस
- महाविकास आघाडी सरकार पडणार नाही, जोपर्यंत..; रामदास आठवले यांचं खळबळजनक वक्तव्य
- भिंतीवरच्या घड्याळ्यानेच काढला काटा! फडणवीसांच्या आरोपांवर वकिल प्रवीण चव्हाणांचा खुलासा