सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील राज्यात जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढ्यातील पिंपळनेरचे आमदार बबनराव शिंदे यांच्या कार्यक्रमात अजित पवार यांनी जातनिहाय जणना झाली पाहिजे. असं म्हटलं आहे. तसेच त्यांनी बिहार राज्याचंही यासाठी उदाहण दिलं आहे.
हेही वाचा…मोठी बातमी..! खोके सरकारची थंडी बिअर योजना! बिअरची विक्री वाढविण्यासाठी सरकारने स्थापन केली समिती
२०२१ ला जनगणना व्हायला हवी होती, पण ती झाली नाही. असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातनिहाय जनगणना कशी केली याची माहिती मागवली असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय. राज्यात सध्या विशिष्ट समाजासाठी आरक्षणाची तरतुद करण्यात आली आहे. मागच्या वेळी आर्थिक मागासवर्गीय लोकांना १० टक्के आरक्षण दिल्याने आरक्षणाची मर्यादा ही ६२ टक्के झाली आहे. तरीही त्यात राहून मराठा समाजाला आरक्षण कसे देता येईलयाबाबत मार्ग काढला जात आहे. असंही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा…विवस्त्र महिलेचा धावतांना व्हिडीओ व्हायरल, भाजप आमदाराच्या पत्नीवर गुन्हा दाखल
दरम्यान, मराठा आरक्षणावर देखील अजित पवारांनी भाष्य केलं आहे. इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्याचा प्रयत्न केले जात आहे. आरक्षणासाठी आम्ही सकारात्मक आहोत. उद्या आरक्षण टिकलं नाही तर हेच लोक बोलतील. राज्यातील जात गणना व्हायला हवी. आम्ही बिहारमधून माहिती मागवली आहे. पैसा खर्च झाला तरी चालेल पण जनगणना गरजेची आहे. असंही अजित पवारांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…Video…! “दैवतं आपलं ठाकरे नव गाणं लॉंच”, शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा टिझर जारी
हेही वाचा…“काम कमी आणि घोषणा जास्त..! हीच महायुती सरकारची काम करण्याची पद्धत”
हेही वाचा…जमीन हडपण्याच्या वादातून महिलेला केलं विवस्त्र, भाजप आमदाराच्या पत्नीवर गुन्हा दाखल, महिला आयोग कारवाई करणार?
हेही वाचा…“महाराष्ट्राचे गृहमंत्रालय झोपले आहे का ?” गुजरातच्या पोलिसांनी संभाजीनगरात ५०० कोटींचा ड्रग्जसाठा केला जप्त
हेही वाचा…फडणवीसांकडून दादांच्या खात्यावर अंकुश, अजित पवार गटाकडून १८२७.६५ कोटींचा दिला हिशोब