मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण सध्या विविध मुद्यांवरून चांगलचं गाजत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक होतांना दिसत आहेत. तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून नाशिकमधून निघालेल्या किसान सभेचा मोर्चा विधानभवनावर लवकरच धडकणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावर लक्ष देण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा..“भाजप-युतीचे सरकार येताच मोर्चे निघतात कसे? यामागचा बोलविता अन करविता धनी कोण ?” भाजपचा सवाल
वन जमिनीच्या प्रमुख प्रलंबित प्रश्नासह शेतीमालाला, हमीभाव, शेतीसाठी वीजपुरवठा, शेती कर्जमाफी यासह अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा सेविका, शालेय पोषण आहार कर्मचारी, ग्रामपंचायत संगणक परिचालक, ग्रामरोजगार सेवक, पोलीस पाटील अशा जनतेशी निगडीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून घोषित करून शासन वेतनश्रेणी लागू करण्याच्या मागणीसाठी भारतीय किसान सभेच्या वतीनं लाॅंगमार्च सुरू करण्यात आला आहे.
हेही वाचा..राज्यभरात 20 लाख कर्मचारी संपावर, राज्याचा कारभार कोलमडणार
या लाॅंगमार्चमध्ये २० ते २५ हजार आंदोलक शेतकरी सहभागी झाले आहेत. दिंडोरीहून आंदोलक शेतकरी रखरत्या उन्हातून चालत मुंबईच्या वेशीवर आले आहेत. त्यांच्याबरोबरची मुख्यमंत्र्यांची बैठक रद्द करण्यात आली आहे, तरी सरकारनं आंदोलक शेतकऱ्यांशी तातडीनं चर्चा करून त्यांचे प्रश्न सोडवावेत. असंही अजित पवार यांनी सांगितले.
Read also
- हेही वाचा..एकनाथ शिंदेंच्या दोन्ही वकिलांच्या युक्तिवादात विसंगती, कोर्टाने वकिलांना सुनावलं
- हेही वाचा..“कुणाला वॉशिंग मशिनमध्ये उडी मारायची असेल, तर…” भुषण देसाईंच्या पक्ष प्रवेशावर आदित्य ठाकरेंची खोचक टिका
- हेही वाचा…महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आंतरराष्ट्रीय नजर, केनियाच्या सरन्यायाधीश कोर्टात हजर
- हेही वाचा…“गोखले यांना अटक करणारी ईडी विक्रांत घोटाळ्यात चुप राहिली” राऊतांचा सोमय्या,फडणवीसांवर निशाणा
- हेही वाचा…” २० लाख कर्मचारी संपावर, सरकारने आपली भुमिका स्पष्ट करावी “? अजित पवार