मुंबई : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक कार्यकर्ते पक्ष प्रवेश करतांना दिसत आहेत. यामध्ये प्रामुख्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बंडाळीनंतर प्रमाण जास्तच वाढला आहे. यातच आता ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भुषण देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावर आता ठाकरे गटाच्या नेत्याकडून आपल्या प्रतिक्रिया देण्यात येत आहे.
हेही वाचा…हसन मुश्रीफांची ईडीच्या कारवाईविरोधात हायकोर्टात याचिका दाखल, सुनावणी सुरू
सुभाष देसाई यांचा मुलगा भुषण देसाई यांचा शिवसेनेशी काही संबंध होता, असं मला वाटत नाही. कुणाला वॉशिंग मशिनमध्ये उडी मारायची असेल, तर ते कुठेही जाऊ शकतात. सुभाष देसाी दररोज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असतात. ते आजही शिवसेनेसाठी काम करत आहेत. त्यांनी कालही सांगितलं की, पद नसलं, मंत्रीपद नसलं. आमदारकी-खासदारकी नसली तरी त्यांना पक्ष कार्यासाठी दिवसातील २४ तास दिले आहेत. त्यांच्यासारखी निष्ठा घेऊनच आम्ही काम करत असतो. असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.
हेही वाचा…सत्तासंघर्षावरील अंतिम सुनावणी..! असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य, हरीश साळवेंचा कोर्टात युक्तिवाद
तर भुषण देसाई यांच्या पक्षप्रवेशावर सुभाष देसाई यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, माझा मुलगा भुषण देसाई याने शिंदे गटात प्रवेश केला ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक आहे. त्याचे शिवसेनेत किंवा राजकारणात कोणतेच काम नाही. त्यामुळे त्याच्या कुठल्याही पक्षात जाण्याने शिवसेनेवर अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही. शिवसेना, वंदनीय बाळासाहेब, उद्धव साहेब व मातोश्रीशी मागील पाच दशकांहून अधिक काळापासून असलेली माजी निष्ठा अढळ राहिल. वयाच्या या टप्प्यावर मी खुप काही करण्याची घोषणा करणार नाही. मात्र इथून पुढे सुद्धा संपुर्ण न्याय मिळेपर्यंत व शिवसेनेचे गतवैभव परत मिळेपर्यंत मी असंख्य शिवसैनिकांच्या सोबतीने माझे कार्य सुरु ठेवणार आहे. असं सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे.
Read also
- हेही वाचा…महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आंतरराष्ट्रीय नजर, केनियाच्या सरन्यायाधीश कोर्टात हजर
- हेही वाचा…“गोखले यांना अटक करणारी ईडी विक्रांत घोटाळ्यात चुप राहिली” राऊतांचा सोमय्या,फडणवीसांवर निशाणा
- हेही वाचा…” २० लाख कर्मचारी संपावर, सरकारने आपली भुमिका स्पष्ट करावी “? अजित पवार
- हेही वाचा..“भाजप-युतीचे सरकार येताच मोर्चे निघतात कसे? यामागचा बोलविता अन करविता धनी कोण ?” भाजपचा सवाल
- हेही वाचा..राज्यभरात 20 लाख कर्मचारी संपावर, राज्याचा कारभार कोलमडणार