मुंबई : राज्याच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. ठाकरे आणि शिंदे गटाकडील वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात येत आहे. आज आणि उद्या दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू राहणार असून लवकरच अंतिम निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आंतरराष्ट्रीय नजर ठेऊन आहेत.
हेही वाचा…सत्तासंघर्षावरील अंतिम सुनावणी..! असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य, हरीश साळवेंचा कोर्टात युक्तिवाद
सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाकडून महेश जेठमलानी युक्तिवाद करीत आहेत. याच दरम्यान केनियाच्या सरन्यायाधीश आणि त्यांच्या सुप्रीम कोर्टातले न्यायमूर्ती सत्ता संघर्षाच्या सुनावणी दरम्यान उपस्थित आहेत. कोर्टात उपस्थित महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची सुनावणी थोडावेळ ऐकणार आहेत. केनियाचे सरन्यायाधीश, न्यायमूर्ती भारताच्या सदिच्छा भेटीवर आले आहेत.
हेही वाचा…“कोणाचं पाप आणि पोरांच्या डोक्याला ताप,” म्हात्रे-सुर्वे प्रकरणावर, आव्हाडांचा खोचक टोला
शिवसेना पक्षफुटीचा प्रश्न हा पक्षांतर्गत वादाचा आहे. आमदारांनी विधिमंडळात बहुमताने निर्णय घेतले आहेत. यात हस्तक्षेप करू नये. उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास नाही. महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याचे पत्र काही आमदारांनी दिले म्हणून राज्यपालांनी चाचणीचे आदेश दिले. पक्ष कुणाचा हे ठरवण्याचा अधिकार निवडणुक आयोगाला आहे. कोर्टाला नाही. असा युक्तिवाद वकिल नीरज कौल यांनी केला आहे.
Read also
- हेही वाचा…“गोखले यांना अटक करणारी ईडी विक्रांत घोटाळ्यात चुप राहिली” राऊतांचा सोमय्या,फडणवीसांवर निशाणा
- हेही वाचा…” २० लाख कर्मचारी संपावर, सरकारने आपली भुमिका स्पष्ट करावी “? अजित पवार
- हेही वाचा..“भाजप-युतीचे सरकार येताच मोर्चे निघतात कसे? यामागचा बोलविता अन करविता धनी कोण ?” भाजपचा सवाल
- हेही वाचा..राज्यभरात 20 लाख कर्मचारी संपावर, राज्याचा कारभार कोलमडणार
- हेही वाचा…हसन मुश्रीफांची ईडीच्या कारवाईविरोधात हायकोर्टात याचिका दाखल, सुनावणी सुरू