मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुरू झाली आहे. मागील काही महिन्यापासून सुरू असलेल्या ह्या राजकीय लढाईत कुणाचा विजय होईल. याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. आजपासून सलग दोन दिवस सर्वोच्च न्यायालयात ठाकरे आणि शिंदे गटाचे वकिल युक्तिवाद करणार आहे. तर कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
हेही वाचा…“दुध का दुध, पाणी का पाणी झालं पाहिजे,” शीतल म्हात्रेंच्या व्हिडीओवरून अजित पवार संतापले
आजपासून उद्या दुपारपर्यंत शिंदे गटाचे वकिल कोर्टात युक्तिवाद करणार आहेत. तर उद्या दुपारपासून ठाकरे गट अंतिम युक्तिवाद करणार असून सत्तासंघर्षावरील निकालाची घोषणा होईल की निकाल राखून ठेवला जाईल? तसेच घटनापीठातील न्यायमूर्ती शाह निवृत्त होण्यापुर्वी निकाल लागणार का ? असा सवालही आता उपस्थित केला जात आहे. आज शिंदे गटाकडून वकिल हरीश साळवे युक्तिवाद करणार आहे.
हेही वाचा..बच्चू कडूंना अटक करा, आसामच्या विधानसभेत मागणी, विरोधक आक्रमक, ‘ते’ वक्तव्य भोवलं
तर सत्तासंघर्षावर प्रकरण हे ९० टक्के पुन्हा विधानसभा अध्यक्षांकडे पाठवणार. असं वकिल असीम सरोदे यांनी सांगितलं आहे. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे जाण्याची शक्यता असून अपात्र आमदारांचं प्रकरण पुन्हा विधानसभेत जाणार का ? असा सवालही उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा..वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कृषीमंत्र्यांच्या विरूद्ध कडक कारवाई करण्याचे धाडस कराल का ?
दरम्यान, कोर्टात शिंदे गटाचे वकिल हरीश साळवे युक्तिवाद करीत आहेत. अध्यक्षांना घटनात्मक अधिकारी असून त्यांना बहुमत चाचणी राजभवनात झाली नाही, ती सभागृहात झाली आहे. बहुमत नसल्याने उपाध्यक्षांनी आपले पद गमावले असा युक्तिवाद करण्यात आला आहे.
Read also
- हेही वाचा…“कोणाचं पाप आणि पोरांच्या डोक्याला ताप,” म्हात्रे-सुर्वे प्रकरणावर, आव्हाडांचा खोचक टोला
- हेही वाचा..राज्यात भाजपमध्ये पुन्हा “लोटस कमळ” सक्रीय, राष्ट्रवादीचा बडा नेता भाजपमध्ये जाणार ?
- हेही वाचा..ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांचे पुत्र एकनाथ शिंदे सोबत, भुषण देसाईंचा पक्ष प्रवेश
- हेही वाचा…जुन्या पेन्शनचा मुद्दा तापला, २० लाख कर्मचारी उद्यापासून संपावर, बैठक निष्फळ
- हेही वाचा…आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीयाला अटक, शीतल म्हात्रे प्रकरणाची SIT मार्फत चौकशी, प्रकरण चिघळलं