मुंबई : राज्यातील शासकीय, निमशासकिय, शिक्षक व सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. राज्यातील अनेक शिक्षकांनी राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. यातच उद्या राज्यातील 20 लाख कर्मचारी सर्व शिक्षकांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्याआधी आज सर्वपक्षीयांची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलवली होती. परंतु यावर काही तोडगा न निघाल्याने उद्यापासून कर्मचारी संपावर जाणार आहेत.
हेही वाचा…राहुल कुल यांच्याविरोधात राष्ट्रवादी अन् काॅंग्रेस एकत्र, निलंबणाची मागणी, कर्ज थकवलं, काय काय आरोप केलेत?
आज रात्री १२ वाजेपासून म्हणजे 14 मार्चपासून राज्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर, महापालिका, नगरपालिका, आरोग्य कर्मचारी, परिचारिका, कक्षसेवक, सफाई कामगार, इत्यादी संपावर जाणार आहे. तसेच सध्या बारावी आणि दहावीच्या परिक्षा सुरू आहेत. त्या परिक्षांचे पेपर तपासणीवर बहिष्कारचा इशारा दिला आहे.
हेही वाचा…‘बाहेरचं पार्सल’ म्हणत राधाकृष्ण विखे पाटलांची रोहित पवारांवर जहरी टिका, कर्जतचं राजकारण तापणार ?
आज जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात विधीमंडळात बैठक पार पडली. या बैठकीत जुन्या पेन्शनबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. यासाठी राज्य सरकार जुन्या पेन्शन योजनेबाबत एक समिती नेमणार आहे. त्या समिती मार्फत जुनी पेन्शन योजना कशा पद्धतीने लागू करण्यात यावी. याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
हेही वाचा..‘लाल वादळ’ विधानसभेवर धडकणार, शेतकरी प्रश्न, पेन्शनचा मुद्दा, मुंबईच्या दिशेने किसान सभेचा मोर्चा
याबाबत आज राज्यातील कर्मचारी संघटना आणि शिंदे फडणवीस यांच्यात सकारात्मक चर्चा झाली आहे. तसेच या योजनेसंदर्भात तातडीने निर्णय घेणे घातक ठरणार आहे. त्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुकाणू समितीही बैठक सुरू झाली आहे. त्यामुळे आता या बैठकीत काय निर्णय घेणार त्याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
Read also
- हेही वाचा…आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीयाला अटक, शीतल म्हात्रे प्रकरणाची SIT मार्फत चौकशी, प्रकरण चिघळलं
- हेही वाचा…“दुध का दुध, पाणी का पाणी झालं पाहिजे,” शीतल म्हात्रेंच्या व्हिडीओवरून अजित पवार संतापले
- हेही वाचा..बच्चू कडूंना अटक करा, आसामच्या विधानसभेत मागणी, विरोधक आक्रमक, ‘ते’ वक्तव्य भोवलं
- हेही वाचा..वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कृषीमंत्र्यांच्या विरूद्ध कडक कारवाई करण्याचे धाडस कराल का ?
- हेही वाचा…“जुन्या पेन्शनसंदर्भात सरकार तातडीने निर्णय घेणार नाही, २० लाख संपकरी संपाच्या वाटेवर”?