नाशिक : राज्यात मागील काही आठवड्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. राज्यातील विविध मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सध्या जोरदार खडाजंगी बघायला मिळत आहे. यातच राज्यात गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी अवकाळी पावसाने हैराण झाले आहे. तसेच शिक्षकांच्या जुन्या पेन्शनचाही मुद्दा चांगलाच तापला आहे. याच पार्श्वभूमीवर किसान सभेचा मोर्चा नाशिकवरून मुंबईच्या दिशेने निघाला आहे.
हेही वाचा..“संजय राऊत यांनी एकदा मोकळा होऊन महाराष्ट्रात फिरून दाखवावं”
माजी आमदार जीवा पांडू गावित यांच्या नेतृत्वाखाली निघालेला मोर्चा पायी पायी मुंबईच्या दिशेने निघाला आहे. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देत लाखो नागरिक मुंबईच्या विधानसभेवर धडकणार आहे. यातच काल नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठ येथे सर्व नाशिक जिल्ह्यातील शेतकरी जमले होते. त्यावेळी मंत्री दादा भूसे यांनी शेतकऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम होते.
हेही वाचा…“कसब्याचा पराभव अजूनही भाजपच्या मनी घुमतोय, मुंबईत पुण्यातील भाजपचे नेत्यांची मंथन बैठक”
दरम्यान, आज विधीमंडळात देखील शेतकऱ्याच्या मुद्दावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. त्याचबरोबर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यात राजकीय नेते आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहेत. आज अधिवेशन सुरू होण्याच्या अगोदर विधीमंडळाच्या पायऱ्यावर ठिय्या आंदोलन करत सत्तारांच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी दिली.
Read also
- हेही वाचा..“इडीच्या चौकशीला हजर राहणार नाही पण..”, ईडीची नोटीस आल्यानंतर मुश्रीफांची पहिली प्रतिक्रिया
- हेही वाचा…“अब्दुल गद्दार, स्वारी अब्दुल सत्तार, ” वादग्रस्त वक्तव्यानंतर आदित्य ठाकरेंची सत्तारांवर बोचरी टिका
- हेही वाचा…कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, तर सभागृहात विरोधक आक्रमक
- हेही वाचा…राऊतांचा ५०० कोटींचा आरोप, राहुल कुलची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “त्यांना अजूनही..”
- हेही वाचा..“राऊतांनी राजकीय बॉम्ब फोडला, पुराव्यासह भाजपच्या आमदारावर ५०० कोटीचा आरोप, चौकशी करण्याची मागणी