मुंबई : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून पहिल्या दिवसापासून विरोधकांनी शेतकऱ्यांचा मुद्दा लावून धरला. कांद्याचं उत्पादन जास्त झाल्याने कांद्या भाव घसरला त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कांदा जमीनीवर फेकून दिला. यावरून विरोधकांनी कांद्याला योग्य ते सानुग्रह देण्याची मागणी केली. त्यावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांद्याला प्रतिक्विंटल ३०० रूपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली.
हेही वाचा…मुश्रीफांच्या घरावर ईडीची धाड, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, की… माहिती..
आपलं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभ आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कांद्याला प्रतिक्विंटल ३०० रूपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा करत असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. त्यावर छगन भुजबळ यांनी आक्षेप घेत शेतकऱ्यांच्या कांद्याला प्रतिक्विंटल ५०० रूपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केली. त्यानंतर सभागृहात एकच गदारोळ बघायला मिळाला.
हेही वाचा..“साडे नऊ तास इडीची चौकशी, हसन मुश्रीफांच्या घरातून इडीचे अधिकारी काय घेऊन गेले?”
दरम्यान, अधिवेशनाचं कामकाज सुरू होण्याच्या अगोदर विरोधकांनी गाजर हात घेत सरकारचा निषेध केला. तसेच कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा विरोधकांकडून जाहीर निषेध करण्यात आला. त्यामुळे आज राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलेलं दिसून येत आहे. सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत.
Read also
- हेही वाचा…राऊतांचा ५०० कोटींचा आरोप, राहुल कुलची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “त्यांना अजूनही..”
- हेही वाचा..“राऊतांनी राजकीय बॉम्ब फोडला, पुराव्यासह भाजपच्या आमदारावर ५०० कोटीचा आरोप, चौकशी करण्याची मागणी
- हेही वाचा..“संजय राऊत यांनी एकदा मोकळा होऊन महाराष्ट्रात फिरून दाखवावं”
- हेही वाचा…“कसब्याचा पराभव अजूनही भाजपच्या मनी घुमतोय, मुंबईत पुण्यातील भाजपचे नेत्यांची मंथन बैठक”
- हेही वाचा…“मुलुंडच्या पोपटाला वेड्याच्या इस्पितळात दाखल करा, लवकरच जनता ठोकून काढेल “, राष्ट्रवादीचा सोमय्यांना टोला