मुंबई : खासदार संजय राऊत यांनी भाजपचे नेते आणि आमदार राहुल कुल यांच्यावर ५०० कोटींचा भ्रष्टचाराचा आरोप केला आहे. पुणे जिल्ह्यातील तालुका दौंड येथील भीमा पाटस सहकारी कारखाना लि. च्या संदर्भात त्यांनी आरोप केला आहे. या प्रकरणाचा त्यांनी पुराव्यासह इडी आणि सीबीआय मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तर राहुल कुल यांनी राऊतांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
हेही वाचा..“साडे नऊ तास इडीची चौकशी, हसन मुश्रीफांच्या घरातून इडीचे अधिकारी काय घेऊन गेले?”
संजय राऊत यांनी अपुऱ्या माहितीच्या आधारे आरोप केले आहेत. त्यांच्याकडे कोणतीही माहिती नाही आहे. तसेच त्यांच्यावर हक्कभंगाचा जो प्रस्ताव आणला आहे. त्याचा समितीचा अध्यक्ष आहे. त्यामुळे आपल्याला समजून येईल. की नेमक काय होत आहे. २२ ते २३ वर्ष मी या कारखान्यावर चेअरमन आहे. कारखाना खाजगी होऊ नये म्हणून आम्ही प्रयत्न केलेत. प्रामाणिक काम करत असतांना राजकारणात असे आरोप होत राहतात.
हेही वाचा..आघाडीने मंजूरी दिली, पण फडणवीसांचे मानले आभार..! रोहित पवारांच्या ‘त्या’ कृतीची सर्वत्र चर्चा
संजय राऊत यांनी यांसदर्भात देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र पाठवलं आहे. त्यात त्यांनी भाजपचे नेते आणि आमदार राहुल कुल यांच्यावर ५०० कोटींचा भ्रष्ट्रचाराचा आरोप केला आहे. पुणे जिल्ह्यातील तालुका दौंड येथील भीमा पाटस सहकारी साखर कारखाना लि. मध्ये ५०० कोटीचा भ्रष्ट्रचार झाल्याचं संजय राऊतांनी पत्रात म्हटलं आहे. याप्रकरणी त्यांनी इडी व सीबीआय मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. तसेच भ्रष्टचारास धर्म व राजकीय पक्ष नसतो. त्यामुळे भ्रष्टाचाराची वाळवी नष्ट होणे गरजेचे आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.
To Shri @KiritSomaiya ji@NirajGunde @nsitharaman @iambadasdanve @NANA_PATOLE @anjali_damania @rahulnarwekar
@BJP4India@@BJP4Maharashtra pic.twitter.com/7KYTTTueVG— Sanjay Raut (@rautsanjay61) March 13, 2023
Read also
- हेही वाचा..“राऊतांनी राजकीय बॉम्ब फोडला, पुराव्यासह भाजपच्या आमदारावर ५०० कोटीचा आरोप, चौकशी करण्याची मागणी
- हेही वाचा..“संजय राऊत यांनी एकदा मोकळा होऊन महाराष्ट्रात फिरून दाखवावं”
- हेही वाचा…“कसब्याचा पराभव अजूनही भाजपच्या मनी घुमतोय, मुंबईत पुण्यातील भाजपचे नेत्यांची मंथन बैठक”
- हेही वाचा…“मुलुंडच्या पोपटाला वेड्याच्या इस्पितळात दाखल करा, लवकरच जनता ठोकून काढेल “, राष्ट्रवादीचा सोमय्यांना टोला
- हेही वाचा…मुश्रीफांच्या घरावर ईडीची धाड, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, की… माहिती..