मुंबई : मागील काही दिवसात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीस आला आहे. त्याचबरोबर कांद्याचा भाव घसरल्याने शेतकरी हैरान झाला आहे. यातच शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळावी, अशी मागणी विरोधक करीत आहे. तर दुसऱ्या बाजूला कृषी मंत्री अब्दुल सत्तार बेताल वक्त्य करीत आहेत. यात त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायलं मिळालं आहे. त्यावर शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांचा उल्लेख अब्दुल गद्दार केला आहे.
हेही वाचा…“मुलुंडच्या पोपटाला वेड्याच्या इस्पितळात दाखल करा, लवकरच जनता ठोकून काढेल “, राष्ट्रवादीचा सोमय्यांना टोला
गेल्या अनेक दिवसापासून घटनाबाह्य सरकारमधील कृषी मंत्री सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करीत आहेत. पहिलं त्यांनी ओला दुष्काळ कुठे आहे, कुठ पाऊस झाला नाही, महिला खासदारांना शिवीगाळ, असं काही नवीन नाही. परंतु ह्या सरकारमधील कोणीही शेतकऱ्यांच्या बाजूने नाही. मंत्री महोदय अब्दुल गद्दार, स्वारी अब्दुल सत्तार असं म्हणत त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध केला.
हेही वाचा…मुश्रीफांच्या घरावर ईडीची धाड, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, की… माहिती..
छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद साधतांना अब्दुल सत्तार यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांना शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणी प्रश्न विचारले असता. ते म्हणाले की, शेतकरी आत्महत्या हा काही आजचा विषय नाही. अनेक वर्षापासून शेतकरी आत्महत्या करत आहेत. असं उत्तर त्यांनी दिलं आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले.
हेही वाचा..“साडे नऊ तास इडीची चौकशी, हसन मुश्रीफांच्या घरातून इडीचे अधिकारी काय घेऊन गेले?”
दरम्यान, अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याच्या विरोधात आक्रमकपणे महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केली. या कृषिमंत्र्यांचे करायचे काय खाली डोके वर पाय… निवडणुकीचा गाजर हलवा… महाराष्ट्राचे बजेट,गाजर हलवा…खोके सरकार हाय हाय… ५०० कोटींचा घोटाळा करणार्या आमदार राहुल कुलवर कारवाई झालीच पाहिजे…सट्टा लावतो म्हणणार्या मंत्र्यांचा धिक्कार असो… अशा गगनभेदी घोषणांनी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.
Read also
- हेही वाचा…कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, तर सभागृहात विरोधक आक्रमक
- हेही वाचा…राऊतांचा ५०० कोटींचा आरोप, राहुल कुलची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “त्यांना अजूनही..”
- हेही वाचा..“राऊतांनी राजकीय बॉम्ब फोडला, पुराव्यासह भाजपच्या आमदारावर ५०० कोटीचा आरोप, चौकशी करण्याची मागणी
- हेही वाचा..“संजय राऊत यांनी एकदा मोकळा होऊन महाराष्ट्रात फिरून दाखवावं”
- हेही वाचा…“कसब्याचा पराभव अजूनही भाजपच्या मनी घुमतोय, मुंबईत पुण्यातील भाजपचे नेत्यांची मंथन बैठक”