कर्जत : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कर्जत येथे भव्य शेतकरी मेळावा आणि पक्ष प्रवेश पार पडला. यावेळी राज्यातील अनेक भाजपचे नेते या सोहळ्यासाठी उपस्थितीत होते. यातच महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर कडाडून टिका केली आहे. त्यांनी रोहित पवारांचा उल्लेख बाहेरचं पार्सल केला.
हेही वाचा..“राऊतांनी राजकीय बॉम्ब फोडला, पुराव्यासह भाजपच्या आमदारावर ५०० कोटीचा आरोप, चौकशी करण्याची मागणी
येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, जिल्हा परिषदा, या सर्व निवडणुकांमध्ये बाहेरचं पार्सल तुम्हाला परच पाठवून द्यायची संधी चालून आली आहे. आपण आपला स्वाभिमान जिवंत ठेवण्याची गरज आहे. राम शिंदे यांच्यासारखा सक्षम नेतृत्व आपल्या जिल्ह्यासाठी मिळालं. त्यांनी खुप काम केलं. परंतु त्यावेळी आपण चुकलो. त्यामुळे येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये फक्त भाजप याठिकाणी निवडून गेला पाहिजे. असं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलं.
हेही वाचा..“संजय राऊत यांनी एकदा मोकळा होऊन महाराष्ट्रात फिरून दाखवावं”
आताचं सरकार दोन्ही हाताने आपल्याला द्यायाला बसलेलं आहे. आपल्याला काय हवं आहे. त्या दृष्टीने ते काम करीत आहेत. अनेक योजना ह्या सरकारने मंजूर केल्या आहेत. त्यामुळे या तालुक्यात राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसला धोबीपछाड करण्याचं काम आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.
Read also
- हेही वाचा..‘लाल वादळ’ विधानसभेवर धडकणार, शेतकरी प्रश्न, पेन्शनचा मुद्दा, मुंबईच्या दिशेने किसान सभेचा मोर्चा
- हेही वाचा..“इडीच्या चौकशीला हजर राहणार नाही पण..”, ईडीची नोटीस आल्यानंतर मुश्रीफांची पहिली प्रतिक्रिया
- हेही वाचा…“अब्दुल गद्दार, स्वारी अब्दुल सत्तार, ” वादग्रस्त वक्तव्यानंतर आदित्य ठाकरेंची सत्तारांवर बोचरी टिका
- हेही वाचा…कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, तर सभागृहात विरोधक आक्रमक
- हेही वाचा…राऊतांचा ५०० कोटींचा आरोप, राहुल कुलची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “त्यांना अजूनही..”