मुंबई : मागील काही दिवसात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीस आला आहे. त्याचबरोबर कांद्याचा भाव घसरल्याने शेतकरी हैरान झाला आहे. यातच शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळावी, अशी मागणी विरोधक करीत आहे. तर दुसऱ्या बाजूला कृषी मंत्री अब्दुल सत्तार बेताल वक्त्य करीत आहेत. यात त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायलं मिळालं आहे. त्यावर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर टिकास्त्र सोडलं आहे.
हेही वाचा…“अब्दुल गद्दार, स्वारी अब्दुल सत्तार, ” वादग्रस्त वक्तव्यानंतर आदित्य ठाकरेंची सत्तारांवर बोचरी टिका
शेतकऱ्यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्या केल्याप्रकरणी अब्दुल सत्तार यांच्यावर कारवाई करावी. अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली आहे. त्यांनी ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, शेतकरी आत्महत्या हा आजचा विषय नाही, अनेक वर्षापासून शेतकरी आत्महत्य करतात असे वादग्रस्त विधान करणाऱ्या कृषीमंत्री अब्दुल सत्तार विरूद्ध कडक कारवाई करण्याचे धाडस कराल? असा सवाल करीत शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या बेजबाबदार व निर्लज्ज कृषीमंत्र्याचा जाहीर निषेध असं म्हटलं आहे.
हेही वाचा…कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, तर सभागृहात विरोधक आक्रमक
गेल्या अनेक दिवसापासून घटनाबाह्य सरकारमधील कृषी मंत्री सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करीत आहेत. पहिलं त्यांनी ओला दुष्काळ कुठे आहे, कुठ पाऊस झाला नाही, महिला खासदारांना शिवीगाळ, असं काही नवीन नाही. परंतु ह्या सरकारमधील कोणीही शेतकऱ्यांच्या बाजूने नाही. मंत्री महोदय अब्दुल गद्दार, स्वारी अब्दुल सत्तार असं म्हणत त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध केला.
“शेतकरी आत्महत्या हा आजचा विषय नाही, अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात”असे वादग्रस्त विधान करणाऱ्या कृषीमंत्री अब्दुलसत्तार विरुद्ध कडक कारवाई करण्याचे धाडस कराल ? शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या बेजबाबदार व निर्लज्ज कृषिमंत्र्याचा जाहीर निषेध.@Dev_Fadnavis
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 12, 2023
Read also
- हेही वाचा…“जुन्या पेन्शनसंदर्भात सरकार तातडीने निर्णय घेणार नाही, २० लाख संपकरी संपाच्या वाटेवर”?
- हेही वाचा…राहुल कुल यांच्याविरोधात राष्ट्रवादी अन् काॅंग्रेस एकत्र, निलंबणाची मागणी, कर्ज थकवलं, काय काय आरोप केलेत?
- हेही वाचा…‘बाहेरचं पार्सल’ म्हणत राधाकृष्ण विखे पाटलांची रोहित पवारांवर जहरी टिका, कर्जतचं राजकारण तापणार ?
- हेही वाचा..‘लाल वादळ’ विधानसभेवर धडकणार, शेतकरी प्रश्न, पेन्शनचा मुद्दा, मुंबईच्या दिशेने किसान सभेचा मोर्चा
- हेही वाचा..“इडीच्या चौकशीला हजर राहणार नाही पण..”, ईडीची नोटीस आल्यानंतर मुश्रीफांची पहिली प्रतिक्रिया