पुणे : खासदार संजय राऊत यांनी भाजपचे नेते आणि आमदार राहुल कुल यांच्यावर ५०० कोटींचा भ्रष्टचाराचा आरोप केला आहे. पुणे जिल्ह्यातील तालुका दौंड येथील भीमा पाटस सहकारी कारखाना लि. च्या संदर्भात त्यांनी आरोप केला आहे. या प्रकरणाचा त्यांनी पुराव्यासह इडी आणि सीबीआय मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तर दौंडमध्ये राहुल कुल यांच्या विरोधात राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस एकत्र आली आहे.
हेही वाचा…राऊतांचा ५०० कोटींचा आरोप, राहुल कुलची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “त्यांना अजूनही..”
भाजपने राहुल कुल यांना पक्षातून निलंबित करावं. तसेच त्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे मागणी करणार असल्याची माहिती माजी जिल्ह्याध्यक्ष आणि तक्रारदार नामदेव ताकवणे यांनी केली आहे. तर 179 कोटीचं कर्ज थकलं. बॅंक नोटीस देऊन कारवाई करणार असं जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष रमेश थोरात यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा..“राऊतांनी राजकीय बॉम्ब फोडला, पुराव्यासह भाजपच्या आमदारावर ५०० कोटीचा आरोप, चौकशी करण्याची मागणी
न्यायालयीन प्रक्रिया याची एक यंत्रणा आहे. त्यावर सरकार असं सुमोटो निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे राहुल कुल यांना अगोदर भाजपने निलंबित केलं पाहिजे. अन् त्याचा निरपेक्ष तपास करावा. असं नामदेव ताकवणे यांनी म्हटलं आहे. तर पाच ते सहा महिन्यापुर्वी १७९ कोटी रूपये थकले होते. त्यांनी पुणे मध्यवर्ती बॅंकला एक पत्र दिलं होतं. त्यांनी ४५ दिवसांची मुदत मागितली होती, त्यावर त्यांना ६० दिवसांची मुदत दिली होती. परंतु ६० दिवस पेक्षा सहा महिने होऊन गेले आहेत. अजून पैसाही भरलेला नाही. सर्व नियमांना धरून कर्ज वाटप केलं आहे. असंही रमेश थोरात यांनी म्हटलं आहे.
Read also
- हेही वाचा…‘बाहेरचं पार्सल’ म्हणत राधाकृष्ण विखे पाटलांची रोहित पवारांवर जहरी टिका, कर्जतचं राजकारण तापणार ?
- हेही वाचा..‘लाल वादळ’ विधानसभेवर धडकणार, शेतकरी प्रश्न, पेन्शनचा मुद्दा, मुंबईच्या दिशेने किसान सभेचा मोर्चा
- हेही वाचा..“इडीच्या चौकशीला हजर राहणार नाही पण..”, ईडीची नोटीस आल्यानंतर मुश्रीफांची पहिली प्रतिक्रिया
- हेही वाचा…“अब्दुल गद्दार, स्वारी अब्दुल सत्तार, ” वादग्रस्त वक्तव्यानंतर आदित्य ठाकरेंची सत्तारांवर बोचरी टिका
- हेही वाचा…कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, तर सभागृहात विरोधक आक्रमक