मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण सध्या विविध मुद्यांवरून चांगलचं गाजत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक होतांना दिसत आहेत. तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून नाशिकमधून निघालेल्या किसान सभेचा मोर्चा विधानभवनावर लवकरच धडकणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते प्रवीण अलई यांनी शेतकऱ्यांच्या मोर्चामागे महाविकास आघाडीचा हात असल्याचं अप्रत्यक्षपणे म्हटलं आहे.
हेही वाचा..ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांचे पुत्र एकनाथ शिंदे सोबत, भुषण देसाईंचा पक्ष प्रवेश
नाशिकमधून काल असंख्य शेतकरी मुंबईच्या दिशेने पायी निघाले आहेत. त्यांचा हा मोर्चा विधानभवनावर लवकरच धडकणार आहे. यावर बोलतांना अलई म्हणाले की, जनतेला विचलित करणारी स्थिती सध्या राज्यात निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी, काॅंग्रेस आणि महाविकास आघाडीची सरकारे होती. त्यावेळी सर्व काही अलबेल व समृद्ध होते का? शेतमालाला अतिरिक्त भाव होता का? असा सवालही त्यांनी केला आहे.
हेही वाचा…जुन्या पेन्शनचा मुद्दा तापला, २० लाख कर्मचारी उद्यापासून संपावर, बैठक निष्फळ
तसेच पुढे बोलतांना ते म्हणाले की, शेतकरी राजा कर्ज मुक्त झाला होता ? पाण्याचे प्रश्न संपुष्टात आले होते का? असा सवाल करीत नाही तर..मग भाजप-युतीचे सरकार येताच मोर्चे निघतात कसे? असा सवालही त्यांनी केला आहे. तसेच यामागचा बोलविता अन करविता धनी कोण ? असा सवाल करीत त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीयाला अटक, शीतल म्हात्रे प्रकरणाची SIT मार्फत चौकशी, प्रकरण चिघळलं
दरम्यान, सभागृहात देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळत आहे. अवकाळी पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचा मोठं नुकसान झालं आहे. तसेच शेतकऱ्यांच्या पिकांचा भाव ही घसरला आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधक सातत्याने आमनेसामने येत आहेत.
जनतेला विचलित करणारी स्थिति..
राज्यात #राष्ट्रवादी–#कॉंग्रेस आणि #महाविकासआघाडी ची सरकारे होती,त्यावेळी सर्व काही अलबेल व समृद्ध होते का?शेतमालाला अतिरिक्त भाव होता का?यामागचा बोलविता अन करविता धनी कोण?#विचारतोयमहाराष्ट्र @NCPspeaks @INCMaharashtra@Dev_Fadnavis
१/२— Pravin Alai (प्रविण अलई) (@PravinAlai) March 14, 2023
शेतकरी राजा कर्ज मुक्त झाला होता का? पाण्याचे प्रश्न संपुष्टात आले होते का?
नाही तर…. मग भाजपा- युतीचे सरकार येताच मोर्चे निघतात कसे?यामागचा बोलविता अन करविता धनी कोण??#विचारतोयमहाराष्ट्र @NCPspeaks @INCMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis
२/२.— Pravin Alai (प्रविण अलई) (@PravinAlai) March 14, 2023
Read also
- हेही वाचा..राज्यभरात 20 लाख कर्मचारी संपावर, राज्याचा कारभार कोलमडणार
- हेही वाचा…हसन मुश्रीफांची ईडीच्या कारवाईविरोधात हायकोर्टात याचिका दाखल, सुनावणी सुरू
- हेही वाचा…सत्तासंघर्षावरील अंतिम सुनावणी..! असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य, हरीश साळवेंचा कोर्टात युक्तिवाद
- हेही वाचा…“कोणाचं पाप आणि पोरांच्या डोक्याला ताप,” म्हात्रे-सुर्वे प्रकरणावर, आव्हाडांचा खोचक टोला
- हेही वाचा..राज्यात भाजपमध्ये पुन्हा “लोटस कमळ” सक्रीय, राष्ट्रवादीचा बडा नेता भाजपमध्ये जाणार ?