सोलापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीवर बसलेल्या मनोज जरांगे पाटलांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. याची झळ आता आमदार, खासदारांना देखील मोठ्या प्रमाणात बसत असल्याचं दिसून आलं आहे. पिंपळनेर कारखाना कार्यक्रमासाठी अजित पवारांना येण्यास मराठा बांधवांनी बंदी घातली असून आता मराठा आंदोलकांचा रोष अजित पवारांवर दिसून येत आहे. तर शरद पवारांचं माढा लोकसभा मतदारसंघात ग्रॅंड वेलकम होणार आहे.
हेही वाचा…देवीच्या दारात खोटारडेपणा, रश्मी ठाकरेंच्या कार्यक्रमाच्या वेळी पंख, एसी बंद, ठाकरे गटाचा आरोप
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार २३ ऑक्टोंबरला माठा येथे बबनदादा शिंदे यांच्या पिंपळनेर साखर कारखान्यावर कार्यक्रमासाठी येणार आहे. मात्र त्यांना मराठा सकल समाजाने येऊ देणार नाही असा इशारा दिला आहे. त्यावर अजित पवारांच्या प्रवेशबंदीची घोषणा केली आहे. यासंदर्भात माढा पोलिसांना तसा अर्ज दिला असून विशेष म्हणजे याच दिवशी माढा तालुक्यातील कापसेवाडी येथे शरद पवार द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीसाठी येत आहे.
हेही वाचा…शिंदे गटाचा २२ जागांवर दावा, फडणवीसांचं लोकसभा निवडणुकीबाबत मोठं विधान
दरम्यान, मागील काही महिन्यापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात जोरदार पेटला आहे. मनोज जरांगे पाटलांनी सरकारला २२ ऑक्टोंबरपर्यंत मुदत दिली आहे. सरकारने याबाबत निर्णय घेतला नाही तर आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाईल. असा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे. यातच आता सत्ताधारी आमदार, खासदारांना मतदारसंघात जाण्यास अडचण येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…ललित पाटीलने तोंड उघडलं तर कोण अडकणार ? राज्यातील ‘या’ नेत्यांची नावे हिटलिस्टवर
हेही वाचा…एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या..! रक्षा खडसे यांच्यासह कुटुंबाला १३७ कोटीची नोटीस, नेमकं प्रकरण काय आहे ?
हेही वाचा…निष्ठावंत असायला हवा तर असा..! 40 वर्षापासून असलेल्या ‘या’ नेत्यांनी राजीनामा दिला, पण ठाकरे गटातच राहणार
हेही वाचा…“ललित पाटीलचा फडणवीसांकडून मोहरा म्हणून वापर”, आतापर्यंत ७०० ते ८०० कोटींचं ड्रग्ज जप्त
हेही वाचा…ठाकरे गटाच्या नेत्यांच्या अडचणी वाढल्या, इडीचं धाडसत्र सुरू, अनेक ठिकाणी छापेमारी