मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून जोरदार तयारी केली जात आहे. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघाचा आढावा उद्धव ठाकरे बैठकांमधून घेत आहेत. यामध्ये स्थानिक नेत्यांना सहभागी करून घेतलं जात आहे. अशातच कल्याण लोकसभा जिल्हा प्रमुख सदानंद थरवळ यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.
हेही वाचा…अत्यंत निकटवर्तीय महिला पदाधिकाऱ्यांनी रश्मी ठाकरेंची साथ सोडली, शिंदे गटात केला जाहीर प्रवेश
शिवसेनेच्या पक्ष फुटीनंतरही सदानंद थरवळ यांनी ठाकरे गटात राहणं पसंत केले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना २७ जुलै २०२२ साली कल्याण लोकसभा जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली. वर्षभर ही जबाबदारी त्यांनी सांभाळली. पक्ष संघटना वाढीस लावण्याचे प्रयत्न केले. मात्र आत्ता पक्षाला अपेक्षित असलेले काम त्यांच्याकडून होत नसल्याचं कारण देत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
हेही वाचा…दिल्लीत अजितदादांची एन्ट्री, होम हवन करत नव्या कार्यालयाचं उद्घाटन, राष्ट्रवादीचं दोन कार्यालय
सदानंद थरवळ हे शिवसेनेत १९८० सालापासून कार्यरत असून त्यांचा शिवसैनिक ते कल्याण लोकसभा जिल्हा प्रमुख असा राजकीय प्रवास राहिला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत ते नगरसेवक होते. राजीनामा दिल्यानंतर ते शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु मी शिवसैनिक होतो. शिवसैनिकच राहणार अन् पक्षाचे काम करणार. मात्र मी शिंदे गटात जाणार या राजकीय चर्चेला काही अर्थ नाही. मी कुठेही जाणार नाही असं म्हणत त्यांनी शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चेंना पूर्णविराम दिलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“ललित पाटीलचा फडणवीसांकडून मोहरा म्हणून वापर”, आतापर्यंत ७०० ते ८०० कोटींचं ड्रग्ज जप्त
हेही वाचा…ठाकरे गटाच्या नेत्यांच्या अडचणी वाढल्या, इडीचं धाडसत्र सुरू, अनेक ठिकाणी छापेमारी
हेही वाचा…देवीच्या दारात खोटारडेपणा, रश्मी ठाकरेंच्या कार्यक्रमाच्या वेळी पंख, एसी बंद, ठाकरे गटाचा आरोप
हेही वाचा…शिंदे गटाचा २२ जागांवर दावा, फडणवीसांचं लोकसभा निवडणुकीबाबत मोठं विधान
हेही वाचा…केवळ संशयाच्या आधारावर ललित पाटीलला अटक, बरंच काही सांगायचंय, ” ललित पाटीलच्या वकिलाचं मोठं विधान