मुंबई : पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काॅंग्रेसचे माजी शहाराध्यक्ष आणि माजी महौपार संजोग वाघेरे-पाटील यांनी आज मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजोग वाघेरे यांच्या हाताला शिवबंधन बांधून त्यांनी पक्षात स्वागत केलं आहे. यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊतांनी शिंदे गट आणि अजित पवार गटावर जोरदार टिका केली.
हेही वाचा…“शीतल म्हात्रे तुझं चिचुंद्रीसारखं तोंड बंद ठेव नाहीतर..”, शीतल म्हात्रेंना सुप्रिया सुळेंवरील टीका भोवली
मागच्या काळात मुख्यमंत्री असतांना उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात अत्यंत महत्वाचं काम केलं होतं. त्यावेळेचं काम पाहून मी उद्धव ठाकरे यांच्याबाबत भावूक झालो होतो. तसेच संजय राऊत हे दरदिवशी मीडियाच्या माध्यमातून दिशा देण्याचं काम करत आहेत. तसेच ठाकरे गटाने मागच्या काळात अनेक महत्वाची काम केली आहे. त्यामुळेच माझ्या कार्यकर्त्यांच्या मनात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करायचं असं ठरलं आणि त्यांची भेट घेतली. त्यानंतर आज हजारो कार्यकर्त्यांच्या सोबत ठाकरे गटात प्रवेश केला आहे. तसेच जी जबाबदारी माझ्यावर देण्यात येईल. ती पार पाडेन असं संजोग वाघेरे यांनी मातोश्रीवर बोलतांना सांगितलं.
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना १५ कोटी रूपयांच्या ८० गाड्या नेमक्या कशासाठी? अजित पवार गटाने दिलं ‘हे’ उत्तर
पन्नास खोके आणि र्स्कोपिओ बॉलेरो यांना लाथाडून संजोग वाघेरे यांनी शिवसेना ठाकरे गटात आलेले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधनात बांधून परिवारात सामावून घेतलं आहे. आम्ही प्रत्येक वेळी शिवसेनेत भावूक होतो. यातच आता संजोग वाघेरे यांना मावळाची जबाबदारी पुन्हा शिवसेनेकडे खेचून आणायची आहे. नववर्ष मावळतांना पुन्हा मावळ आपल्याकडे उजेडात आणायचं आहे. असं खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…“फक्त पक्ष अन् लोकांची घरं फोडण्याचं काम भाजपने केलंय, “सुप्रिया सुळेंचा भाजपवर आक्रोश
दरम्यान, मातोश्रीत आलेल्या सर्व शिवसेनेच्या वाघांनो तुमचं मातोश्री आणि शिवसेनेत स्वागत करतो आहे. असा काळ आहे की आता भावूक आणि घाऊक असा फरक कळायला लागला आहे. जे भावूक आहेत ते निष्ठेने शिवसेनेसोबत आहेत. परंतु जे घाऊक आहेत त्यांना खोक्यांमध्ये बांधून ठेवण्याची गरज आहे. सुरूवातीपासून मावळ मतदारसंघ शिवसेनेकडे राहिला आहे. गद्दार आणि स्वाभिमानी यातला फरक संजोग वाघेरे यांच्यामध्ये आहे. आज शिवसेनेकडे काहीच नाही. परंतु सत्ताधाऱ्यांनी सत्ता हिसकावून घेतली आणि गद्दारी केली. परंतु सत्ताधारी पक्षाकडे गर्दीचा ओघ असतो, परंतु सत्ता नसतांना सत्ता आणण्याच्या जिद्दीने आपण आला आहात. अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“२०२४ च्या पोटात काय दडलंय?” शिंदे गटासोबतच्या युतीसंदर्भात मनसेची मोठी प्रतिक्रिया
हेही वाचा…संतापजनक…! भाजप नेत्याचा अल्पवयीन मुलीवर ब’ला’त्का’र ; भाजपच्या राज्यात मुली सुरक्षित आहेत का?
हेही वाचा…“..म्हणून वाघाला पिंजऱ्याच्या आडून गुरगुरावं लागतं”, अमोल कोल्हेंचा अजित पवारांना अप्रत्यक्ष खोचक टोला
हेही वाचा…“मी बाजारू विचारवंत किंवा धंदेवाईक कार्यकर्ता नाही”, म्हणून.. मिटकरींना त्यांच्याच भाषेत शरद पवार गटाने सुनावलं
हेही वाचा…“मी बाजारू विचारवंत किंवा धंदेवाईक कार्यकर्ता नाही”, म्हणून.. मिटकरींना त्यांच्याच भाषेत शरद पवार गटाने सुनावलं