मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण ईडी कोर्टाने जे निरीक्षण नोंदवलं आहे, त्यामुळे एकनाथ खडसे यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. प्राथमिकदृष्ट्या पाहिलं तर एकनाथ खडसेंनी पुणे जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचं स्पष्ट दिसतं आहे, असं स्पष्ट निरीक्षण ईडी न्यायालयाने नोंदवलं आहे.
सुनेच्या गंभीर आरोपानंतर भाजपचे खासदार रामदास तडस यांनी दिली पहिली प्रतिक्रिया
एकनाथ खडसेंनी मंत्री असताना पदाचा गैरवापर करत स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांना फायदा करवून दिला, असंही कोर्टाने म्हटलं आहे. त्यामुळे एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना अशा परिस्थिती आरोपीला जामीन देता येणार नाही अन्यथा समाजात वाईट संदेश जाईल, असं कोर्टाने ठणकावून सांगितलं. न्यायालयाने असंही म्हटलंय की, या गोष्टीकडेही दुर्लक्ष करुन चालणार नाही, की खडसे हे महाराष्ट्रातल्या सत्ताधारी पक्षाचा भाग आहेत. मात्र हा गुन्हा घडताना ते भाजपमध्ये होते, अशी स्पष्टोक्ती त्यांनी दिली आहे.
काय आहे भोसरी जमीन घोटाळा?
फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे 3.1 एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप 2016 मध्ये झाला होता. 31 कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ 3.7 कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे.
भाजप खासदाराच्या सुनेचे कुटुंबियांवर गंभीर आरोप, राष्ट्रवादीकडे केली मदतीची मागणी
हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून एमआयडीसीने 1971 मध्ये तो अधिग्रहण केला होता, परंतु उकानी यांना नुकसान भरपाई देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. खडसे यांनी 12 एप्रिल, 2016 रोजी बैठक बोलावली आणि अधिकाऱ्यांना जमीन उकानींना परत द्यावी की त्यांना जास्त नुकसानभरपाई द्यावी याविषयी त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचा दावा केला जातो. पंधरवड्यातच उकानी यांनी खडसे यांच्या नातलगांना (पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी) भूखंड विक्री केल्याचं समोर आलं होतं.
Read Also :
- भाजपा करुणा शर्मा यांच्या पाठीशी; प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची ग्वाही
- शरद पवार उद्धव ठाकरेंच्या भेटीला; कोणत्या मुद्यांवर चर्चां होणार, राजकीय तर्कवितर्कांना उधान
- तडस यांच्या कौटुंबिक वादाला नवे वळण, गंभीर आरोपानंतर आता वादावर पडदा पडणार?
- “नांदेड फक्त झलक, आवाज उठवायचा म्हटलं तर…” संभाजीराजेंचा ठाकरे सरकारला इशारा
- राष्ट्रवादी स्वबळावर लढणार? मलिकांचं मोठं विधान; केली ‘मिशन ११४’ ची तयारी सुरु