मुंबई : राज्यातील महत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षामध्ये राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीतील अनेक राजकीय नेत्यांच्या सुरक्षा कमी करण्यात आली आहे. तर सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या सुरक्षेतत देखील वाढ करण्यात आली आहे.
“मग हे संघ भाजपवाले युपी, गुजरातच्या अंगणात पाणी भरतील”; राष्ट्रवादीने डिवचलं
अमृता फडणवीस यांना सुरूवातीला वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. त्यात आता वाढ करून त्यांना राज्य सरकारने वाय प्लस करण्यात आली आहे. यामुळे आता अमृता फडणवीस यांच्या सुरक्षेतमध्ये एस्कॉर्ट वाहनासह 5 पोलीस कर्मचारी चोवीस तास तैनात असणार आहेत. मुंबई पोलिसांच्या संरक्षण आणि सुरक्षा विभागाने या संदर्भात वाहतूक विभागाला आवश्यक सुचना देण्यात आल्या आहेत.
“भाजप अन् बाळासाहेबांची शिवसेना महाराष्ट्राला उंचीवर नेणार”
अमृता फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, अमृता फडणवीस यांनी सुरक्षा वाढवण्याची मागणी केली नव्हती. धोक्याची भीती लक्षात घेऊन उच्चाधिकार समितीने सुरक्षा वाढवण्याच्या निर्णय घेतला आहे. ट्रॅफिक क्लिअरन्स वाहनाचा अर्जही दिला नसल्याचे ते म्हणाले. ठाकरे कुटुंबीय आणि इतरांना यापुर्वी अशा सुविधा दिल्या होत्या. ही सुविधा पदासाठी नाही, त धोक्याची भीती लक्षात घेऊन दिली जात आहे. असंही ते म्हणाले.
Read also
- संजय राऊतांच्या भोवती पोलिसांचा गराडा..! दिलासा नाहीच, पुढील सुनावणी 9 नोव्हेंबरला
- राहुल गांधीच्या पदयात्रेत धक्काबुक्की..! महाराष्ट्रातील बडा नेता गंभीर जखमी
- भाजप-शिंदेंना पाणी पाजण्यासाठी ठाकरेंची मोठी रणनीती.! तयारी आतापासून सुरू
- “उद्धव ठाकरेंचे कट्टर समर्थक शिंदे गटात”; ठाकरेंच्या पक्षाला गळती सुरूच
- “निवडणुका जिंकलो काय, निवडणुक हरलो काय, पण..:” गुलाबराव पाटलांचं सुचक वक्तव्य