मुंबई : काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेला लोकांकडून मोठा प्रतिसाद बघायला मिळत आहे. कन्याकुमारीहून निघालेली यात्रा आता तेलंगाणा राज्यात पोहचली आहे. यामध्ये राहुल गांधी यांनी पाचशे पेक्षा अधिक किलोमीटरचा प्रवास केला आहे. राहुल गांधी यांना पाहण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहेत. यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत काॅंग्रेसचा महाराष्ट्रातील बडा नेता जबर मार बसला असून ते सध्या रूग्णालयात उपचार घेत आहे.
“रवी राणा यांचा राजीनामा घेतला गेला नाही तर..:” सुषमा अंधारेंनी साधला निशाणा
राहुल गांधी यांच्या पद यात्रेत महाराष्ट्रातील काॅंग्रेसचे आमदार नितीन राऊत यांनी देखील सहभाग घेतला. मात्र तेलंगाणा राज्यातील हैद्राबाद येथे राहुल गांधी यांना पाहण्यासाठी अल्लोट गर्दी जमा झाली. लोकांना राहुल गांधी यांच्यापासून दुर ठेवण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे. यातच तेलंगणातील एका एसीपी दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याने नितीन राऊत यांना जोरात ढकलले या सगळ्या गोंधळात त्यांना जबर मार बसला आहे.
“राणा, कंभोज, खोत, सदावर्ते, पडळकरांना आता फडणवीसांनी गुजरातला पाठवावे”
पोलिसांनी नितीन राऊत यांना ढकलल्याने ते जमीनवर पडले. त्यानंतर त्यांच्या डोक्याच्या एका बाजूला मार बसला. तर उजवा डोळ्याला देखील दुखापत झाली. त्यामुळे त्यांचा उजवा डोळा काळानिळा पडला आहे. त्यानंतर त्यांना हैदाराबाद येथील बासेरी रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. या सर्व प्रकरानंतर काॅंग्रेसचे अध्यक्ष मलिक्कार्जून खरगे, के.सी. वेणुगोपाल. के. राजू यांच्यासह काॅंग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी रूग्णायलायत जाऊन त्यांच्या तब्बतेची चौकशी केली.
“रवी राणांनी माझी माफी मागितली, त्यांचे जाहीर आभार”; बच्चू कडूंनी वाद मिटवला
दरम्यान, राहुल गांधी यांनी देखील नितीन राऊत यांना फोनवरून आपल्या दुखापतीविषयी चौकशी केली. मंगळवारी संध्याकाळी हा सगळा प्रकार घडला आहे. यातच राहुल गांधी यांची पदयात्रा महाराष्ट्रात 8 नोव्हेंबर रोजी येत आहे. राहुल गांधी यांच्यासोबत चालण्यासाठी महाराष्ट्रातील काॅंग्रेसचे नेते चालण्याची तयारी करताना दिसत आहे. यावेळी राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रात दोन सभा होणार असून ते आठ दिवस महाराष्ट्रात प्रवास करणार आहेत.
Read also
- भाजप-शिंदेंना पाणी पाजण्यासाठी ठाकरेंची मोठी रणनीती.! तयारी आतापासून सुरू
- “उद्धव ठाकरेंचे कट्टर समर्थक शिंदे गटात”; ठाकरेंच्या पक्षाला गळती सुरूच
- “निवडणुका जिंकलो काय, निवडणुक हरलो काय, पण..:” गुलाबराव पाटलांचं सुचक वक्तव्य
- “मग हे संघ भाजपवाले युपी, गुजरातच्या अंगणात पाणी भरतील”; राष्ट्रवादीने डिवचलं
- “भाजप अन् बाळासाहेबांची शिवसेना महाराष्ट्राला उंचीवर नेणार”