मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या ईडी कोठडीत वाढ करण्यात आली आहे. अनिल देशमुख यांचा कोठडीतील मुक्काम आणखी तीन दिवसांनी वाढवण्यात आला असून न्यायालयाने १५ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.
सार्वजनिकरित्या माफी मागून ते ट्विट ४८ तासांत डिलिट करा,अन्यथा…; अमृता फडणवीसांचा मलिकांना इशारा
अनिल देशमुख यांची ईडी कोठडी आज संपत होती. त्या पार्श्वभूमीवर आज विशेष पीएमएलए कोर्टात सुनावणी पार पडली. ईडीने अनिल देशमुखांची कोठडी वाढवून मागितली होती. तर, अनिल देशमुखांच्या वतीने कोठडीला विरोध करत युक्तिवाद केला. मात्र, आम्हाला केवळ त्यांचा जबाब नोंदवायचा आहे. त्यामुळे किमान दोन दिवस ईडी कोठडी वाढवावी, असे म्हणणे ईडीकडून मांडण्यात आले.
वरचा मजला रिकामा असलेल्या कंगनाचा पद्मश्री पुरस्कार रद्द करा – नीलम गोऱ्हे
अनिल देशमुख ईडीसमोर बाजू मांडत असताना त्यांनी ‘मी ईडीची २०० हून अधिक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत,’ अशी माहिती दिली आहे. तसंच, ‘मला १० दिवस ईडी कोठडीत ठेवण्यात आले. अधिकाऱ्यांनी भरपुर प्रश्न विचारले. जवळपास ८ ते दहा तास चौकशी झाली. मी दोनशेहून अधिक प्रश्नांची उत्तरे दिली, असं देशमुख यांनी म्हटलं आहे. दरम्यान, चौकशीदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी तुमची छळवणूक केली का?, असा प्रश्न न्यायाधीशांनी विचारला असता त्यांनी अनिल देशमुख यांनी ‘नाही’ असं उत्तर दिलं आहे.
संजय राऊत पिसाळलेलं पात्र, त्यांच्या मेंदूत 21 इंजेक्शन मारण्याची गरज – गोपीचंद पडळकर
‘सचिन वाझेची या प्रकरणात महत्त्वाची भूमिका असल्याचे ईडी म्हणत आहे. मात्र, ईडीने वाझेला या प्रकरणात अद्याप एकदाही अटक करून कोठडी मिळवलेली नाही. देशमुख यांच्या पीए आणि सचिवांना अटक केली. आता खासगी व्यक्तींची चौकशी करायची आहे, देशमुख यांच्या मतदारसंघातील एका व्यक्तीसमोर बसवून देशमुख यांची चौकशी करायची असल्याचे ईडी आज म्हणत आहे. सचिन वाझेला न्यायालयीन कोठडीत असताना चौकशीसाठी बोलावले जाऊ शकत असेल तर अनिल देशमुख यांना न्यायलयीन कोठडीत असताना तसे बोलावले का जाऊ शकत नाही? ईडी कोठडीच्या वाढीची विनंती ईडी का करत आहे?,’ असे म्हणणे अनिल देशमुख यांच्यातर्फे त्यांचे वकिल विक्रम चौधरी यांनी आज कोर्टासमोर मांडले.
Read Also :
- राज्यात ‘बिगबॉस’चा शो, पुरोगामी महाराष्ट्राला कोणाची दृष्ट लागली काय माहिती – पंकजा मुंडे
- पिंपरी-चिंचवड भाजपाचा किल्ला अभेद्य; ‘पीएमआरडीए’च्या निवडणुकीत सर्व उमेदवार विजयी
- कंगना रनौतचा पद्मश्री पुरस्कार तात्काळ काढून घ्या, गुन्हा दाखल करा; नवाब मलिकांचा हल्लाबोल
- भाजपाच्या माजी मंत्र्याने मंदिराची शेकडो एकर जमीन हडप केली; नवाब मलिकांचा गंभीर आरोप
- कंगनाने देशाचा अपमान केलाय, लाज लज्जा असेल तर तिने माफी मागावी – संजय राऊत