नागपूर : राज्यात मागील काही आठवड्यापासून चाललेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचे पडसाद आज विधानभवनात बघायला मिळाले. तसेच बेळगाव याठिकाणी आंदोलन करण्यासाठी निघालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतल्याने सभागृहात आणखीच गोंधळ माजला. याच पार्श्वभूमीवर काॅंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राजकारण तापलं..! “बोम्मई, ही सीमा हिंदुस्थानात आहे, पाकिस्तानात नाही” ; सेनेच्या नेत्याचा इशारा
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून केलेल्या चिथावणीखोर ट्विटबाबत महाराष्ट्राची दिशाभूल केली जात असून, या गंभीर प्रकरणावर राज्य सरकार गप्प का आहे? सीमावाद पेटल्यानंतर केंद्रीय गृहमंत्र्यांनी बैठक घेतली व सामोपचाराचा सल्ला दिला. असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलंय.
“मग अमित शहांसोबची चर्चा हे केवळ नाटक होतं का?” बेळगाव आंदोलन तापलं, मविआच्या नेत्यांना अटक
पुढे बोलताना ते म्हणाले की, पण महाराष्ट्राची भूमिका नेहमीच सामंजस्याची राहिली आहे. चिथावणी देण्याचे काम तर कर्नाटककडून सुरू आहे. तेथील मुख्यमंत्री सरकारच्या चिथावणीखोर भाषा वापरतात. तरीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले जात नाही. त्या वादग्रस्त ट्विटचे प्रकरण दाबण्याच्या कर्नाटक सरकारच्या प्रयत्नांना जणू महाराष्ट्र सरकारही मदत करते आहे. राज्यातील सरकारने याबाबत नरमाईची आणि बोटचेपी भूमिका घेतली आहे. याचे उत्तर महाराष्ट्राला मिळाले पाहिजे. अशी मागणी देखील अशोक चव्हाणांनी केली आहे.
“एकदम ओक्केच्या घोषणांनी विधानभवन पुन्हा दणादणाला, हिवाळी अधिवेशनाला वादळी सुरूवात”
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यात याच वादावरून विभानसभेत खडाजंगी बघायला मिळाली. यावरून सभागृहाचं वातावरण चांगलचं गोंधळचं निर्माण झालं.
Read also
- हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विविध आंदोलनांनी वेधलं लक्ष्य
- तुम्हाला मंत्रीपद हवं आहे का ? अन् फडणवीसांनी थेट सुनिल प्रभूला दिली ऑफर
- “कर्नाटक सरकारची दडपशाही सहन करणार नाही”; बेळगाव प्रवेशबंदीवरून अजित पवार संतापले
- “भाजपच्या दृष्टीने सध्याचे मुख्यमंत्री क्रिकेटमधील नाईट वॉचमन”; काॅंग्रेसची जहरी टिका
- आई ती आईच असते..! राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे 2.5 वर्षाच्या बाळाला घेऊन विधानभवनात