बेळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. त्याआधी कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद पेटला आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दुसऱ्या बाजूला आक्रमक भूमिका घेतली आहे. बेळगाव याठिकाणी आंदोलन करण्यासाठी गेलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना कर्नाटक पोलीसांनी अडवलं असून काही नेत्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं आहे. त्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“चंद्रकांत पाटलांनी घेतला शाई फेक प्रकरणाचा धसका, आता तोंडावर थेट फेसमास्क लावला”
कर्नाटक सीमेवर महाराष्ट्रातील नेत्यांना रोखण्यात येत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना मी आठवण करून देतो की ही सीमा हिंदुस्थानात आहे, पाकिस्तानात नाही. इथे अजूनही संविधानाचे राज्य आहे, आंदोलन करण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. तो डावलत असाल तर हा अन्याय सहन केला जाणार नाही. असं अंबादास दानवे यांनी म्हटलंय.
अन्, स्टेजवरच सुषमा अंधारेंनी शरद पवार अन् उद्धव ठाकरेंचे घेतले आशीर्वाद, भाजपची टिका
बेळगावात महाराष्ट्र समितीच्या महामेळाव्यास परवानगी नाकारून मेळाव्यासाठी घातलेला मंडप काढण्याच्या सूचना कर्नाटक सरकारने पोलिसांनी दिल्या आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. मग गृहमंत्री अमित शहांसोबची चर्चा हे केवळ नाटक होतं का? असा सवालही रोहित पवारांनी केला आहे.
“राज्याच्या मातीला फुटीचा, गद्दारीचे संकट तेव्हा महाराष्ट्र पेटून उठतो” ; अजित पवार
नाटक नसेल तर शहा साहेबांनी दिलेल्या आदेशाला वाटाण्याच्या आक्षता लावणाऱ्या मुजोर कर्नाटक सरकारबाबत केंद्राने तातडीन कठारे कारवाई करावी आणि राज्य सरकारनेही मीठाची गुळणी टाकून आतातरी मराठी माणसासाठी कठोर भूमिका घ्यावी. असं म्हणत रोहित पवारांनी शिंदे सरकारवर भाष्य केलं आहे.
Read also
- “मग अमित शहांसोबची चर्चा हे केवळ नाटक होतं का?” बेळगाव आंदोलन तापलं, मविआच्या नेत्यांना अटक
- “एकदम ओक्केच्या घोषणांनी विधानभवन पुन्हा दणादणाला, हिवाळी अधिवेशनाला वादळी सुरूवात”
- “एकनाथ शिंदें साहेब जागे व्हा, भाजपला तुमचं नेतृत्व मान्य नाही”
- सरकार आंधळ, बहिर, मुक,आणि पळकुट; महामोर्चात भुजबळांचा हल्लाबोल
- “फडणवीसांनी राज्यपाल अन् आपल्या सहकाऱ्यांच्या बुद्धीची तपासणी करावी”, सेनेचा टोला